Monday, December 12, 2011

राज्य करावं तर शिवाजी महाराजां सारखं


राज्य करावं तर शिवाजी महाराजां सारखं .......

शूर असावं तर राणा प्रतापसारखं.

स्वामिनिष्ठ असावं तर खंडो बल्लाळासारखं.

देशभक्त असावं तर भगतसिंगसारखं.

कारस्थानी असावं तर आनंदीबाईसारखं .

हुशार असावं तर बिरबलासारखं .

धाडसी असावं तर डॉ.आनंदी जोशीसारखं.

करिअर करावी तर लता मंगेशकरसारखी
.

सगळ्यांच्या गळ्यातील ताईत ह्वाव तर सचिन तेंडूलकरसारखं.


सत्तेला चिकटून रहाव तर शरद पवारांसारख.


राजकीय पक्ष बदलावेत तर सुब्रमन्यम स्वामीसारखं.


बेसूर गाव तर अलिशा चिनॉयसारखं.


समस्त लोकांना उल्लू बनवावं तर ललित मोदीसारखं.


अष्टपैलू लेखक असावं तर जयवंत दळवीसारखं.


देशाला ललामभूत ह्वाव तर बिल गेट्ससारखं.


निरलस सेवार्थी ह्वाव तर डॉ.तात्यासाहेब लहानेसारखं.


शब्दांचे बुडबुडे फोडावेत तर कॉंग्रेससारखं.
राष्ट्रभाषेचे धिंडवडे काढावेत तर ममता बनेर्जीसारखे.


लग्न न करता नुसतच बिनधास्त बरोबर रहाव तर बिपाशा बसूसारखं .


लग्नाशिवाय झालेली मुलगी खुल्लम खुल्ला वाढवावी तर नीना गुप्तासारखी.


खमक्या असावं तर लालू प्रसादसारखं.


लफडेबाज असावं तर टायगर वूड्ससारखं.


लग्न करावीत तर एलिझाबेथ टेलरसारखी

.
उद्योगपती ह्वाव तर टाटासारखं.


सहकुटुंब यशस्वी ह्वाव तर अमिताभ बच्चनसारखं.


अनाकलनीय लिहाव तर ते ग्रेससारखं.

व्यंगचित्रे काढावीत तर ती आर.के.लक्ष्मणसारखी.

बाराच्या भावात जाव तर राजेश खन्नासारखं .

गझल गावी तर मेहंदी हसनसारखी.

घर असावं तर मुकेश अंबानीसारखं.

बायको असावी तर अभिषेक बच्चनसारखी.

चालीचा चोर असावं तर अन्नू मलिकसारखं.

भ्रष्टाचारी असावं तर इंडियन मेडिकल 
कौन्सिलचा अध्यक्ष केतन देसाईसारखं.


बोलबच्चन असावं तर अरुण जेटलीसारखं.
प्रेमवीर असावं तर शोऐब मलिकसारखं.

निर्ल्लज कामांध असावं तर किचकासारखं किंवा शायनी आहुजासारखं.

प्रेक्षक नाहीत हे कळून सुद्धा सिनेमे काढावेत तर देव आनंदसारखं.

बाईने रूपवान व 'ग्रेसफुल' असावं तर गायत्री देवीसारखं.

बाईन कस नसाव तर राखी सावंतसारखं .

निर्विष विनोद करावा तर पु.ल.देशपांडेसारखा.

लग्न करून सुखी ह्वाव तर माधुरी दीक्षितसारखं.

लग्न करून दुखी ह्वाव तर अदनान सामीसारखं.

दुसरी बायको करायची तर हेमा मालीनिसारखी.

त्रेचाळीस वय झाल तरी देवाच्या नावावर सोडलेल्या बोकडासारखं बकऱ्यांच्या
मागे उंडरत फिरायचं तर सलमान खानसारखं.

बाबा आदमच्या जमान्यात लिहलेल्या एका कादंबरीच्या जीवावर मिशीला तूप
लावून फिरायचं तर भालचंद्र नेमाडेसारखं.


बाबा आदमच्या जमान्यात काढलेल्या एका चित्रपटाच्या जीवावर आजही टेचात
फिरायचं तर रामदास फुटाणेसारखं.


आनंदात व उत्साहात जगायचं तर माझ्यासारखं.

Wednesday, November 30, 2011

Tuesday, November 29, 2011

Diveagar Trip


Diveagar Trip 14-15/08/2011 Slideshow: Mahesh’s trip to Pune, Maharashtra, India was created by TripAdvisor. See another Pune slideshow. Create your own stunning free slideshow from your travel photos.

Ganpatipule Trip Slideshow: Mahesh’s trip from Pune, Maharashtra, India to Ganpatipule was created by TripAdvisor. See another Ganpatipule slideshow. Create your own stunning free slideshow from your travel photos.

Sunita Slideshow: Mahesh’s trip to Pune, Maharashtra, India was created by TripAdvisor. See another Pune slideshow. Take your travel photos and make a slideshow for free.

Saturday, October 22, 2011

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा .........


दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा .........


 उटण्यांचा सुवास,बंबाचा धूर
फराळाची ताटं,दारावरची तोरणं
आधणाचं पाणी,फोडलेली चिरांटी
फटाक्यांचे आवाज,मातीचे किल्ले
किल्ल्यांवरचं पोपटी,कोवळं जंगल
नवे कोरे शिवाजीमहाराज !
नवे जुने मावळे, त्यातच मोटारी आणि
बोगद्यातून डोकावणार्‍या आगगाड्या सुद्धा...
सारवलेलं अंगण,अंगणातलं तुळशीवृंदावन,
समोर रेखलेली रंगीत रांगोळी,पणत्यांची आरास ,
दारात झुलणारे आकाशदिवे,
आणि नव्या कोर्‍या परकर पोलक्यातली मी...
पणत्यात तेवणार्‍या मंद वाती
राहिल्यात सातासमुद्रापलिकडे,
पण दिवाळी मनात जागते आहे... 
नाताळच्या बाजारात मी दिवाळीसाठी पणत्या शोधते
रंगीत,सुवासिक मेणबत्त्या आणून घरभर लावते.
दिवाळी पहाटेची सुरुवात मग
भारतातल्या 'फोन'ने होते.
हा दूरध्वनी ... दूर चा आवाज खूप जवळ आणतो
पापण्यांच्या कडा ओलावतो; इथल्या आणि तिथल्याही...
इथले सुह्रद मग फराळाला येतात,
चिवडा,करंज्या,शंकरपाळे खाताना
कुतुहलाने अनेक प्रश्न विचारतात.
उत्साहाची कळी मग पुन्हा उमलते, 
आणि मनातली रांगोळी घरभर उमटते... 
सर्वांना ही दिवाळी आणि येणारे नूतन वर्ष भरपूर आनंदाचे,
भरभराटीचे आणि आरोग्यपूर्ण जाओ ह्या शुभेच्छांच्या  .........

Friday, October 21, 2011

एका प्रियकराची लग्नानंतर ची प्रतिक्रिया ........


एका प्रियकराची लग्नानंतर ची प्रतिक्रिया ........


यायला परत हिचा फोन.......,
आणि पुन्हा तेच प्रश्न,
कुठे आहेस..?, कसा आहेस..?,
काय करतोssssssय ..,?
झाली का कामं..?
... कप्पाळ माझं...!
हिला समजत नाही का.., मी कधी गाडीवर असतो,
कधी मीटिंग मध्ये, कधी बॉसच्या केबिनमध्ये,
कुठेही वाजते हिच्या प्रश्नांची रिंगटोन,
चायला, च्यायला परत हिचा फोन.......,




कुठे पाळून नाही जाणार, सयंकाळी येइल न घरी,
'तेव्हा विचारशीsssल जे विचारायचं ते...,
सारं काही सांगेल.
झालंsssssss.., रडा-रडी सुरु - , 'तू खुप बदललाय,
लग्न आगोदर असा नव्हातास, माझ्यासाठी किती वेळ असायचा तुझ्याकडे, इत्यादि, इत्यादि.
अगं, ' तेव्हा लपून भेटायचो, वाटायचं भेटशील की नाही, वरून घरच्यांची भीती,
आता कधीही भेटलो तरी रोकनार कोण.?,
च्यायला परत हिचा फोन.......,




बरं दिवसातून पन्नास वेळा हिचे SMS,
लव यू, मिस यू, ---- यू आणि काय काय..,
SMS पाठवला, भावना पोहोचल्या मग फोन चे काय काम,
तर म्हणे तुझा आवाज ऐकावासा वाटला,
घे ऐक, बोलतो नाही चांगला मोठ्यानी ओरडतोच,
मग बसते धारण करून मौन,
च्यायला परत हिचा फोन.......,




अगं किती प्रेम करशील, कधी कधी मलाच वाटत मीच तुझ्या लायकीचा नाही....

Saturday, October 1, 2011

किती क्षणाचं आयुष्य असतं!

किती क्षणाचं आयुष्य असतं!........




किती क्षणाचं आयुष्य असतं!
..
आज असतं तर उद्या नसत म्हणूनच



ते हसत हसत जगायचं असतं!

कारण इथं कुणी कुणाचं नसतं!


जाणारे दिवस जात असतात!


येणारे दिवस येतच असतात.


जाणारांना जपायचं असतं.


येणारांना घडवायचं असतं.


आणि


जीवनाचं गणित सोडवायचं असतं...

Friday, September 30, 2011

मुली एकमेकाला भेटतात तेव्हा

मुली एकमेकाला भेटतात तेव्हा............




मुली एकमेकाला भेटतात तेव्हा.. 


Aye Hi, कशी आहेस..? आज या ड्रेस मध्ये छान

दिसतेयस..



ती मुलगी गेल्यावर सोबतच्या मैत्रिणिला:

बावळट आहे ती, मला अजिबात नाही आवडत..


.
. मुलगे एकमेकाला भेटतात तेव्हा..


क्या बे कुत्ते, कमिने फोन करने को टाइम नही है


क्या?


तो मुलगा गेल्यावर सोबतच्या मित्राला.. He


Is My Best Friend..


. .
Moral: मुली तोंडावर गोड बोलतात पण त्यांचे


मन काळे असते.. तर.? मुले


बोलताना शिव्या देतात पण साफ मनाचे असतात.

सावली नको होवूस

सावली नको होवूस................




सावली नको होवूस,

ती तर सोडून जाते सूर्या सोबत...


अस्तिव असते तिचे फक्त सूर्यापर्यन्त !!!

अश्रू नको होवूस,


ते तर ओघळून जातात गालावरून.....


अस्तिव असते त्यांचे फक्त दुखः पर्यन्त !!!

राहा एक आठवण बनून,


मनात आयुष्य भर.....


अस्तिव असते तिचे शेवटच्या श्वासा पर्यंत......!!!!

कोंबडी



कोंबडी.........




कोंबडी शिवाय उरूस नाही,
.
अन् भानगडीशिवाय पुरुष नाही!!!!!!!!!!!!

Thursday, September 22, 2011

तू म्हणजे एक स्वप्न ............

तू म्हणजे एक स्वप्न 


तू म्हणजे एक स्वप्न
भल्या पहाटे पडणारे
तरीही खोटे ठरनारे ......

तू म्हणजे एक स्वप्न
मनात दडून ठेवलेले
कितीही लपवले तरीही
डोळ्यांतुन ओघळनारे

तू म्हणजे एक स्वप्न
श्वासा - श्वासासात भिनलेले
तरीही दूर दूर असणारे ...

तू म्हणजे एक स्वप्न
तुझ्याच आठवणीत जगणारे
मैत्रिणी जवळ असुनही
तुलाच शोधित फिरणारे

तू म्हणजे एक स्वप्न
दिवसा सुद्धा छळणारे
तू सोबत नसतानाही
असल्याचे भासविनारे

तू म्हणजे एक स्वप्न
आठवणींची गर्दी करणारे
अनेकदा आवरले तरीही
पुन्हा सर्वत्र पसरनारे

तू म्हणजे एक स्वप्न
कधीही माझे न झालेले
तू दूर असलास तरीही
तुझ्याच सुखासाठी
तळमळणारे

Wednesday, April 27, 2011

भारतीय स्त्रियांच्या कुंकवाला फार महत्व आहे

भारतीय स्त्रियांच्या कुंकवाला फार महत्व आहे.........
भारतीय स्त्रियांच्या कुंकवाला फार महत्व आहे. पूर्वीच्या
काळी स्त्रिया कपाळाच्या मध्यभागी कुंकू लावायच्या. त्याच्यापाठीमागे काही शास्त्रीय कारण आहे. फक्त
स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनी देखील कपाळाला गंध
लावणे अपेक्षित आहे. पूर्वीच्या काळी स्त्रिया पिंजर
 लावायच्या. साधारणपणे लाल, चॉकलेटी किंवा मरून रंगाची पिंजर जास्त प्रमाणात
 वापरली जायची. पूर्वीच्या काळी स्त्रिया चंद्रकोर लावायच्या.

हिंदू धर्मात स्त्रीचं सौभाग्य कपाळावर लावलेल्या कुंकवामुळे समजतं. कोणत्याही

लग्न झालेल्या स्त्रीने कपाळावर कुंकू लावावं, असा अलिखित नियम आहे. हिंदू
धर्मात कपाळावर कुंकू, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा आणि गळ्यात मंगळसूत्र
हे तीन सौभाग्यालंकार मानतात.

हल्लीच्या सगळ्याच गोष्टींवर चित्रपट आणि सिरियल्सचा खूपच प्रभाव होत

चाललेला दिसतो. मग त्यातून टिकल्या कशा काय सुटतील? म्हणूनच आज
 असंख्य प्रकारांच्या, आकाराच्या, रंगाच्या लेटेस्ट फॅशनच्या फॅन्सी टिकल्या
 लावण्याचा स्त्रिया आणि तरुण मुलींमध्ये ओघ दिसून येतो.

अलीकडच्या फॅशनच्या युगात कपड्यांच्या लेटेस्ट स्टाइलमुळे नवीन लग्न

झालेल्या मुली टिकली लावत नाहीत. जीन्स, टी-शर्ट घातल्यावर टिकली
सूट होत नाही असं त्यांचं म्हणणं असतं. पण जर लग्न समारंभात
साडीवर, शरारा अशा कपड्यांवर टिकलीशिवाय कोणत्याही
स्त्रीच्या सौंदर्याला उठाव येत नाही.

हल्ली प्रत्येक गोष्टींमध्ये फॅशनचा

 शिरकाव झाल्यामुळे, त्याच्या
नावाखाली अनेक नवीन-नवीन
 वस्तू बाजारात येत आहेत.
अशाच या फॅशनच्या युगात
ड्रेसवर किंवा साडीवर
लावण्यासाठी वेगवेगळ्या
प्रकारच्या, आकाराच्या
आणि रंगाच्या अनेक टिकल्याही
 बाजारात आल्या आहेत. काही
स्त्रिया अगदी छोटी टिकली लावतात,
काही कपाळभर मोठ्ठ कुंकू लावतात
 तर काही जणी पूर्ण मळवट भरतात
 अगदी ह्या काळातदेखील.

गेल्या काही वर्षांमध्ये सिरियल्समुळे बिंदीच्या क्षेत्रात खूप मोठी क्रांती

घडल्यासारखी वाटते. काही वर्षांपूर्वी सौभाग्यवती स्त्रिया कुंकवाचा
वापर करत असत. टिकल्या फक्त उत्तर भारतीय स्त्रिया प्रामुख्याने
 लावत. त्या ठराविक आकारात मिळत. त्यानंतर लिक्वीड फॉर्ममधील
कुंकू बाजारात आले. मग त्यात रंगसुध्दा आले. हल्ली त्याचा वापर
कालबाह्य झाला आहे. त्यानंतर मरून, लाल, काळ्या रंगाच्या
वेलवेटमधल्या टिकल्या मार्केटमध्ये आल्या.

चेह-यावरून हात फिरवल्यामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे कुंकू

किंवा गंध पसरतं. पण तेच टिकली पडली की दुसरी लगेचच लावता येते.
 त्यामुळे टिकली हा प्रकार कुंकवाऐवजी फारच लोकप्रिय झाला.
पण गेल्या दोन-अडीच वर्षांपासून टिकल्यांमध्ये वेगवेगळे प्रकार,
डिझाइन्स, रंग, टिकल्यांची लांबी, उंची, तसेच वेगवेगळ्या रंगाचे
गंध यात फार मोठा बदल झाला आहे.

कोणत्याही समारंभात किंवा पाटीर्मध्ये पारंपरिक ड्रेसवर वेगवेगळया

प्रकारच्या टिकल्या लावलेल्या अनेक मुली दिसतात. 'ताल' चित्रपटामुळे
एकच पांढरा खडा अशी फॅशन आली.

जसजशी टिकल्यांची फॅशन येत गेली , तसतशी टिकली हे नाव मागे

पडलं आणि बिन्दी हे नाव रूढ झालं. त्याचबरोबर टिकल्या बनवण्याच्या
 पद्धतीमध्ये आणि त्याच्या मटेरियलमध्येही खूप फरक पडू लागला आहे.
 काळानुरूप विविध रंगाच्या, विविध आकाराच्या, विविध पद्धतीच्या
 वेलवेटच्या टिकल्या येऊ लागल्या आहेत. त्याचबरोबर टिकल्यांच्या
वेलवेटमुळे आणि चिकटण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोंदाचा काही
अपाय होऊ नये , म्हणून काळजी घेतली जाऊ लागली.

अनेक छोट्या कंपन्या या उत्पादनात उतरल्याचं आढळतं. आजकाल

वेलवेटशिवाय प्लॅस्टिक फॉर्ममध्ये कॉम्प्युटरवर टिकल्या तयार होऊ
 लागल्या आहेत. फॅन्सी टिकल्यांमध्ये सगळ्या रंगांबरोबर मणी, मोती,
खडे, कुंदन हे प्रकार आहेत. यामध्ये सिंगल खडा, डबल खडे, गोल खडा
लावलेला असतो. टिकल्यांच्या प्रकारांप्रमाणेच टिकल्यांचे असंख्य आकार
आहेत. त्यामुळे कोणत्याही रंगाच्या ड्रेसवर किंवा साडीवर मॅचिंग टिकली
 लावू शकतो.

नववधूसाठीच्या खास प्रकारच्या फॅन्सी टिकल्या माकेर्टमध्ये असून ,

त्याची किंमत 100 ते 150 रुपयांपर्यंत आहे. नववधूप्रमाणेच नवरदेवासाठी
 अक्षता , खडे यांनी तयार केलेला टिळाही याच किंमतीमध्ये आहे.
पूर्वी लग्नामध्ये कुंकवाने किंवा गंधाने मळवट भरण्याची पद्धत होती;
पण हल्ली मळवट टिकली मिळते आणि तीही आपल्याला हव्या
त्या आकारांमध्ये.

काही प्लेन टिकल्यांमध्ये निळा ,

 जांभळा , हिरवा या रंगांच्या
 टिकल्या प्लेन साडीवर लावण्याची
फॅशन आहे. प्रत्येक मुलगी किंवा
स्त्री पाहिजे त्या आकाराची ,
 प्रकाराची आणि किंमतीची
टिकली खरेदी करू शकते. आजकाल
भांगामध्येसुद्धा टिकली लावण्याची
फॅशन आहे. यामध्ये झिगझॅग
आकाराची सिल्व्हर आणि गोल्डन
रंगाची टिकली जास्त चालते. याची
लांबी चार ते पाच इंच असते.
 लग्नामध्ये अनेक मुली अशा प्रकारच्या टिकल्या लावलेल्या दिसतात. अशा
या टिकल्यांच्या किंवा बिंदीजच्या दुनियेतील टिकल्या दोन रुपयांपासून
300-400 रुपयांपर्यंत आहे. किंमत कितीही असू देत; पण एखादी टिकली
आवडली की, ती टिकली महिला घेतातच. कारण टिकली किंवा बिंदी
हा स्त्रीचा सौभाग्याचा अलंकार आहे आणि त्यामुळे स्त्रीच्या
सौंदर्यात नक्कीच भर पडते.

Monday, April 25, 2011

मनातले दुःख माझ्या चेहरयावर का दीसले ?

 
मनातले दुःख माझ्या चेहरयावर का दीसले ?
 
मनातले दुःख माझ्या चेहरयावर का दीसले ?
कोणासाठी हसावे कोणासाठी रडावे ,
 
मनातील दुःख कोणाला सांगावे
 कीतीदा मनातल्या मानत आपण बोलावे .
 
मनातल्या मनात खुप गोंधळ झालाया,
अशरुनी डोळ्यात महासागर बनलाय ,
 
हया जीवनाचा खुप कणटाळ आलय,
जग्नायाचा जणू आनादाच हरवून गेलाय.
 
ही दशा झाली आहे माझ्या मनाची
अता काळजी करू तरी कुणाची
 
आस आहे ती धावत येण्याची वाट पाहतोय त्या चार क्षण सुखाची .....................

Wednesday, March 9, 2011

खरच तुला माझा कंटाळा आला आहे का ?

खरच तुला माझा कंटाळा आला आहे का ?

मला माहित आहे तुला ONLINE
यायला वेळ मिळत नाही, मी मात्र
तू आली का येवून गेलीस ?ह्या विचारात
मला तुझे हाल हवालही कळत नाही


मी जेव्हा ONLINE येतो तेव्हा
तुला कदाचित येण्यास जमत नाही
किंवा तू आधीच येवून गेलेली असतेस
मला एकही कॉमेंट न देता OFFLINE झालेली असतेस


तुला ONLINEपाहता माझे मन
कशी आहेस ? विचारण्यास धडपडते
पण तू मात्र बिझी राहून, मला टाळून
इतरांशी गप्पा मारत राहते


माझे साधे स्क्रेप्स तुला कधीच
का आवडत नाही
आणि माझ्याकडे पैसे कमी आहेत म्हणून
महागडे गिफ्ट देणे मला परवडत नाही


कदाचित तुला हाय PROFILE
मित्रांशी गप्पा मारायच्या असतील
पण कदाचित त्यांच्या अश्लील शब्दांत
एक दिवस तू संकटात सापडशील !


मी चाट विनंती पाठवली की
तू कधीच स्वीकार करीत नाही
माझ्या भावना धुडकावून
दुखी मनाचा विचारच करत नाही


सखी भरपूर मित्र मिळव तू
पण त्यातले विश्वासू कोण ते तूच ठरव
चांगले मित्र फार भाग्याने मिळतात
आपल्या सुख दुखाचे खरे वाटेकरी ठरतात


तू सदा हसत राहावी
प्रत्येक्त क्षण तू आनंदात जगावी
ह्याचा विचार मी सदैव करतो
सखी देवाजवळ हीच प्रार्थना करतो


मी तुला नेट मैत्रीण म्हणून
कधीच पाहत नाही,
शेवटच्या श्वासापर्यंत माझी मैत्री असेन
हे घे वचन माझे जरी मी ह्या जगात असेन वा नसेन


खरच तुला माझा कंटाळा आला आहे का ?
कि नवीन मित्रांच्या शोधात तू रमलीस ?
हे सखी तसे मला सांग मी वाट पाहत आहे
का? अशी मला तुझ्या पासून दूर लोटत आहे


कदाचित भावनेच्या भरात , तुझ्या प्रेमात
चुकलो तर माफ कर ..........

Thursday, March 3, 2011

लग्नाच्या गाठी.........

लग्नाच्या गाठी.........

जन्मोजन्मीचं वैर काढत तो दिवसरात्र तिच्याशी भांडत असतो


कोण म्हणतो लग्नाच्या गाठीदेव स्वर्गात बांधत असतो

लग्नापूर्वीचे गुलाबी दिवस

लग्नानंतर राहत नाही

एकदा लग्न लावून दिलं की

देवसुद्धा खाली पाहत नाही.

मग लग्नापूर्वीचा तो हुशार नवरा

तिला भलताच चक्रम वाटायला लागतो

...आणि हळुहळू तिच्या चेह-यावरचा

प्रेमळ मुखवटा फाटायला लागतो.

आपला नवरा बैल आहे

असं प्रत्येक बाईला वाटत असतं

त्याच्या त-हेवाईक वागण्याचं दुःख

तिच्या मनात दाटत असतं

तो कधी कसा वागेल
ह्याची जरासुद्धा खात्री नसते

नको तेच नेमकं बोलून जाईल

जे बोलायचं त्याला कात्री असते.

मग जमेल तिथं, जमेल तेव्हा, जमेल तितकं

ती त्याला बोलत बसते

त्याच्या तेही डोक्यावरून जातं

पण ह्या नंदीबैलाची मान डोलत असते

त्याचा तो गबळा अवतार

तिला नीट्नेटकं राहयचं असतं

तिला चार दिवस सासूचे

त्याला स्पोर्ट्स चॅनल पाहायचं असतं

लहान मोठ्या चाकाचा हा संसाराचा रथ

पळत कसला, रांगत असतो

कोण म्हणतो लग्नाच्या गाठी

देव स्वर्गात बांधत असतो

ती तरी थोडी त्याच्यासारखी असेल

असं प्रत्यक्षात घडत नाही
त्याच्या स्वप्नाचे पंख लावून

ती त्याच्या आकाशात उडत नाही

तो गच्चीत तिला घेऊन जातो

इंद्रधनुष्यावर चालायला

ती सोबत पापड कुरडया घेते

गच्चीत वाळत घालायला

त्याच्या डोळ्यात क्षितिजावरची

लखलखती शुक्राची चांदणी असते

हिच्या डोक्यात गोडा मसाला

आणि वर्षभराची भाजणी असते

प्रेमात रंगून, नशेत झिंगून

खूपसं जवळ, काहीसं लांबून

थोडीशी घाई, थोडसं थांबून

पौर्णिमेचा चंद्र त्याला

तिच्या केसात माळायचा असतो

..................आणि त्याच वेळेस तिला

मोरी धुवायची असतो.

आपली बायको म्हैस आहे

असं हा रेडा सगळ्यांना सांगत बसतो

कोण म्हणतो लग्नाच्या गाठी

देव स्वर्गात बांधत असतो.........

Wednesday, February 23, 2011

फॅशन.....

फॅशन......

प्रेम करुन लग्न करणं
आज जुनं झालंय
लग्नापूर्वी पोर काढ्णं
आज फॅशन झालंय

झाकण्यासाठी अंगभर कपडे घालणं
आज जुनं झालंय
कपड्यासाठी अंग उगड ठेवणं
आज फॅशन झालंय

बापापुढं पोरानं नम्र राहणं
आज जुनं झालंय
पोरासंगे बापानं बिअर पिणं
आज फॅशन झालंय

पोरीसंगे आईनं देवळात जाणं
आज जुनं झालंय
आईसंगे पोरीनं डिस्कोत जाणं
आज फॅशन झालंय

डोक्याचं सोडून कंबरेला बांधणं
आज जुनं झालंय
कंबरेच सोडुन डोक्याला बांधणं
आज फॅशन झालंय

जपप्यासाठी संस्कृती प्रयत्न करणं
आज जुनं झालंय
विरोधात संस्कृतीच्या बबाळ करणं
आज फॅशन झालंय

Monday, February 7, 2011

माझी....लाडकी मैत्रिण............


माझी....लाडकी मैत्रिण............

तशी ती स्वभावाने अबोलच,स्व:तामध्ये रमणारी,सांगण्या सारखं खुप असायचं तिच्याकडे, पण डोळ्यातुनच बोलणारी.मी अगदीच विरुद्ध,सतत बडबड करायचो,तू अगदी "टू मच" आहेस हे ऐंके पर्यंत पिडायचो.तसेही तिला पिडल्या शिवाय मला तरी कुठे चैन पडायची.मग तिला हसवण्यासाठीच माझी मिमिक्री असायची.कारण ती माझी....... लाडकी मैत्रिण होती.

तिला काही हवं असल की अगदी हक्काने मागायची..काय काय शोधुन हवे याची एक मोठी यादीच मिळायची.....कधी एखादे गाणे तर त्यात कधी कविता असायची...थोडा जरी शोधायला उशीर झाला की मात्र लगेच रुसायची...ती होती गाण्यांची दिवानी..तिला आवडायची...सगळी सुंदर गाणी....मी देखील मग फक्त तिच्या साठी सगळी शोधाशोध करायचो....मला नव्हती गाण्यांची आवड....तरी तिच्या साठी फक्त ऐंकायचो...कधी मित्रा कडून मिळव..तरी कधी दुकानात जावून तिच्यासाठी सिडिस घ्यायचो...मग ती जेव्हा गोड हसुन "थॅक्स" म्हणायची, तेव्हा ती खुपच छान वाटायची....कारण ती माझी.....लाडकी मैत्रिण होती.....

तसा मी खुप समजुतदार,पण तिच्यासमोर वेंधळ्यासारखा वागायचो..सांगायचे काही वेगळेच असायचे,पण काही वेगळेच बोलायचो....मग मात्र ती खुप खुप चिडायची..तू काय मुर्ख आहेस का?असे सुद्धा म्हणायची.तिच्या नाकावर कधी कधी खुप राग असायचा,कधी शब्दातून नाही दिसला तरी,तो तिच्या अबोल्यातून कळायचा.अश्या वेळी ती खुप खुप गप्प असायची,मी एकटाच "हाय" करायचो तरीही नाही बोलायची.मी मात्र सगळ काही हसण्या वरती न्यायचो...तिच्या समोर जरी वेधळा असलो तरी, तेव्हा मात्र समजुतदार व्हायचो.तिलाच माझी नंतर थोडी थोडी दया यायची,मग ती हळूच हसायची....तिची कळी खुललेली पाहून,माझी मुद्रा ही खुलायची...कारण ती माझी....लाडकी मैत्रिण होती.

एक दिवस का कुणास ठाऊक कसे आक्रीत घडले...नियतिच्या मनात काही वेगळेच असते, हे त्या दिवशी कळले.सांगायचे होते काय? आणि प्रकरण भलतीकडे वळले.....माझ्या ही डोक्यात त्या दिवशी भरपुर राग गेला...शस्त्रांनी जितक्या जखमा केल्या नसतील..तितक्या दोघानाही शब्दानी झाल्या.देवाला ठाऊक असेल फक्त,कोणी कोणाला हर्ट केले,पण एक मात्र नक्की, तिचेमाझे भांडण झाले.मैत्री पेक्षा तिचे माझे इगो मोठे झाले,शेवटी एकमेकाशी न बोलायचे ठरले अन दोघांचे जीव शांत झाले.मी मात्र आज ही तिला खुप मिस करतो,आता ती कशी असेल,याचा सुद्धा विचार करतो. तिच्या काळजीने आज ही जीव तितकाच जळतो.कधी कधी तिच्याशी खुप बोलावेसे वाटते,आज काय घडले ते सगळे सांगावेसे वाटते.विचार येतो मनात,"ती तुला विसरली सुद्धा असेल,तू कोण हे देखील तिला आठवत नसेल."......फोन पर्यन्त हात जातो,पण मी रिसिव्हर खाली ठेवतो...आज नाही पण उद्या नक्किच बोलू असे मनात म्हणतो...कारण ती माझी....लाडकी मैत्रिण होती.

Friday, February 4, 2011

मराठी जोक्स.....

मराठी जोक्स.......

चिनी कुत्र्याचे नाव काय ?
..........हे हुंग ते हुंग
भारत सोडून जाणार्‍या माणसाला काय म्हणाल ?
..........हिंदुस्तान लिव्हर
नेपाळमध्ये चोर्‍या का होत नाहीत ?
..........कारण तिथे सगळेच गुरखे आहेत.
रशियन डोअरकिपरचे नाव काय ?
.........उभा का बस की
हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते ?
.........कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात
अनुपम खेरला ३१ डिसेंबरला मुलगी झाली तर तिचे नाव काय असेल ?
.......वर्षा अ खेर
हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
........ओला होईल
ब्रूस लीच्या आईचे नाव काय ?
.........माऊ ली
त्याच्या मोठ्या बहिणीचे नाव काय ?
.......थोर ली
लहान बहिणीचे नाव काय ?
.......धाक ली
जेंव्हा घड्याळात तेरा ठोके पडतातती वेळ कुठली असते ?
.......घड्याळ दुरुस्त करण्याची
एकदा भारत आणि पाकिस्तान चे सैनिक समोरासमोर येतात पण ते युद्ध करत नाहीत. का बरं?????
.........कारण ढिशुम ढिशुम तर पेप्सोडेन्ट चे काम आहे ना

Thursday, January 27, 2011

Friday, January 14, 2011

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ......

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ......

तिळगुळ घ्या गोड बोला........आमचे तिळगुळ सांडू नका आणि आमच्या संगे भांडू नका .............   परत एकदा........ तिळगुळ घ्या गोड बोला........

Thursday, January 13, 2011

Wednesday, January 5, 2011

अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी........

अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी........
 
एकदा डोळ्यातल्या एका अश्रुने दुस-याला विचारले......
'ए आपण असे कसे रे
ना रंग, ना रूप,
नेहमीच चिडीचुप,
आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर,
दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर,
कोणीच कसे नाही थांबवत आपल्याला,
किनारा ही नाही साधा या पापण्याला............
दुस-यालाही मग जरा प्रश्न पडला,
खुप विचार करून तो बोलला,
रंग-रूप नसला तरी,
चिडीचुप असलो जरी,
आधार आपण भावनांचा,
आदर राखतो वचनांचा,
सान्त्वनांचे बोल आपण,
अंतरीही खोल आपण,
सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे,
दु:खाच्या प्रसंगी आपलेच महत्व,
आपल्याला नाही कोणी थांबवु शकत,
बंधनात नाही कोणी बंधवु शकत,
उद्रेक आपण मनातील वेदनांचा,
नाजुक धागा वचनातील बंधनांचा,
भावबंध ह्र्दयातील रुदनांचा,
स्वरबद्ध झंकार तनातील स्पन्दनांचा ,
म्हणुनच,
आपले बाहेर पड़णे भाग आहे,
आपल्यामुलेच आज हे जग आहे.
अशीच आपली कहाणी.........
ऐकून ही अश्रुची वाणी
अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी.......................

Tuesday, January 4, 2011

" मानलेल्याना नात्याला ही पळवाट नेहमीच असते "


मानलेल्याना नात्याला ही पळवाट नेहमीच असते "


मानलेल्याना नात्याला ही पळवाट नेहमीच असते
त्यासाठीच ते  पकडून ठेवायचे असते
नात असण्यात आणि मानण्यात जमीन आसमानाचा फरक असतो
असलेल नात जड़ झाल तरी माणूस झिडकारू शकत नाही नाकारू शकत नाही
 मनातून उतरलेल्या व्यक्तिशी कोणतही नात ठेऊ नका
अस नात फक्त त्रास देत
पण मनाने जोडलेल्या नात्याला कधीही अंतर देवू नका
 कारण ते हृदयात बसलेले असते "                  
  एकवार आपण कर्ज मानल, की ते देण माणसाच कर्तव्य आहे
 नाहीतर आपल्याला ते मनात मिंदय करत
मनात दास्य निर्माण करत
शून्यातने मिळालेला शेवटचा रुपया ही जुगारात लावायला आवडेल
 कारण मी शुन्यातून विश्व निर्माण करू शकतो
 मग त्या रुपयातून का नाही पण हें सगळे चांगल्यासाठी 
 तसं देवाने मला चांगलच "बनवल" आहे  मी देव मानतो
पण मी प्रयत्नवादी आहे. "  

                          "ज्याला आपली मत मांडता येत नाही त्याला मत असून नसून सारखीच!!! 
आपली मत मांडण्यापेक्षा दुसर्याला पटणारे विचार बोलायचे.
मग विषय संपतो विश्वासघात फक्त विश्वासू व्यक्तीच करू शकते.
स्वत:च्या अस्तित्वावर बेतल की, या जगात कोणी कोणाच नसत
एक माणूस म्हणून तुम्हाला सगळे गुन्हे माफ़.... पण माणूस असाल तर..."

                      " वादळ कधी परवानगीची वाट पाहत दारावर थांबत का?
 संसारात आपण कोणत्या व्यक्तिबरोबर संसार करतो आहे तिला महत्त्व द्यायला हव संसाराला नाही
 श्रद्घा प्रेम शिकवते आणि अंधश्रद्धा फक्त बळी मागते
 "निसर्गाला रंग हवा असतो, फुलानाही गंध हवा असतो,
माणूस हा एकटा राहणार कसा, कारण त्यालाही मैत्रीचा छंद हवा असतो !!!!!"
पण फसवणाऱ्या  व्यक्तिसाठी माझ्या आयुष्यात स्थान नाही
सोय पाहून केला जातो तो व्यवहार आणि गैरसोयीतही सोय पहिली जाते ते प्रेम
हिशोब कळतो पण किम्मत कळत नाही"

                     मला गाने  म्हणायला आवडत पण मी गाने  म्हटलेल लोकांना आवडत नाही.
मला प्राणी आवडतात पण त्याना कैद करण आवडत नाही
प्रत्येकाला स्वातंत्र्य दिल जाव कारण पकडून पकडून मैत्री करायाला आवडत नाही.
 पण मैत्री केल्यावर पकडून ठेवायला आवडत "



                       जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत लढाईचा शेवट होण शक्यच नाही.
आयुष्यातली प्रत्येक लढाई जिंकली नसेन कदाचित.... पण लढली जरुर आहे 
 "या जन्मावर.. या जगण्यावर शतदा प्रेम करावे...!!"
 आणि हेच जगणे आनंदी करणारी काही नाती माझ्या आयुष्यात महत्वाची आहेत.
 आयुष्यातील चांगुलपणावर विश्वास. खोटेपणा, वाईट वृत्ती, माणंस यांचा तिरस्कार..!!
नशीबावर विश्वास नाही.आयुष्य तुम्हाला ज्या मार्गाने नेत असेल त्या मार्गाने जाऊ नका.
 तर तुम्हाला ज्या मार्गाने जायचे असेल त्या मार्गाने आयुष्याला न्या "

                      मी कधीच कोणती गोष्ट अर्धवट सोडत नाही
 चांगल किंवा वाईट झाल तरी त्याच खर कारण शोधून काढतो
 मी माझा कोणताच निर्णय नियतिवर सोडत नाही..