Friday, October 21, 2011

एका प्रियकराची लग्नानंतर ची प्रतिक्रिया ........


एका प्रियकराची लग्नानंतर ची प्रतिक्रिया ........


यायला परत हिचा फोन.......,
आणि पुन्हा तेच प्रश्न,
कुठे आहेस..?, कसा आहेस..?,
काय करतोssssssय ..,?
झाली का कामं..?
... कप्पाळ माझं...!
हिला समजत नाही का.., मी कधी गाडीवर असतो,
कधी मीटिंग मध्ये, कधी बॉसच्या केबिनमध्ये,
कुठेही वाजते हिच्या प्रश्नांची रिंगटोन,
चायला, च्यायला परत हिचा फोन.......,




कुठे पाळून नाही जाणार, सयंकाळी येइल न घरी,
'तेव्हा विचारशीsssल जे विचारायचं ते...,
सारं काही सांगेल.
झालंsssssss.., रडा-रडी सुरु - , 'तू खुप बदललाय,
लग्न आगोदर असा नव्हातास, माझ्यासाठी किती वेळ असायचा तुझ्याकडे, इत्यादि, इत्यादि.
अगं, ' तेव्हा लपून भेटायचो, वाटायचं भेटशील की नाही, वरून घरच्यांची भीती,
आता कधीही भेटलो तरी रोकनार कोण.?,
च्यायला परत हिचा फोन.......,




बरं दिवसातून पन्नास वेळा हिचे SMS,
लव यू, मिस यू, ---- यू आणि काय काय..,
SMS पाठवला, भावना पोहोचल्या मग फोन चे काय काम,
तर म्हणे तुझा आवाज ऐकावासा वाटला,
घे ऐक, बोलतो नाही चांगला मोठ्यानी ओरडतोच,
मग बसते धारण करून मौन,
च्यायला परत हिचा फोन.......,




अगं किती प्रेम करशील, कधी कधी मलाच वाटत मीच तुझ्या लायकीचा नाही....

No comments: