Wednesday, November 17, 2010

मला आवडत ........

मला आवडत  ........

मला आवडत  ........
ते तुझ दिसंण , ते तुझ हसण ..
सर्वांमधे सामाहुनी एकटच असण .

समजावून सांगन आणि समजुन घेण
सर्व काही समजुन ..उमजुन न घेण..

थोडस चिडण, थोडस रडण..
अन पुन्हा शहाण्यासारख हसण..

डोळ्यांचा बोलावा अन गालावरच्या खळीच खुलण
जसा बंध फुलांचा हळूवार उमलण

प्रेम व्यक्त करताना ..अव्यक्त होण..
जस लाजाळूच्या झाडाच ..अलगद मिटून घेण ...

मला आवडत  ........
ते तुझ दिसंण , ते तुझ हसण..
सर्वांमधे सामाहुनी एकटच असण .

पूढच्या जन्मी तरी माझी होशील ?

पूढच्या जन्मी तरी माझी होशील ?
पूढच्या जन्मी तरी माझी होशील ?
मग तू सोडून गेल्याचं दुःख नसेल,
आपण कोणावर तरी प्रेम करू शकलो
यातच मग मला समाधान असेल

कधीतरी असा एक दिवस येइल,
प्रेमापोटी मझ्या तू परत येशील...
पण तेंव्हा या प्रेमाला अर्थ नसेल,
कारण तेंव्हा मी या जगीच नसेन...

कधीतरी मग या मनालाही समजेल,
तूझ्या परतीची अशा तेंव्हा मावळेल...
त्यावेळेस जीवनाला या अर्थ नसेल,
कारण शरीराला तेंव्हा या मनंच नसेल...

प्रेम करा पण.......

 प्रेम करा पण.......
प्रेम करा पण.......
जबाबदारीची जाणीव ठेवा
प्रेम करा पण.......
मर्यादा सोडू नका
प्रेम करा पण.......
दुस-यांना दु:ख देउ नका
प्रेम करा पण.......
एकमेकांची मनं ओळ्खा
प्रेम करा पण.......
सर्व गमावून बसू नका
प्रेम करा पण.......
आई वडिलांचा विचार करायला शिका

* विवाहसंस्कार विधी *

* विवाहसंस्कार विधी *
देव, ब्राह्मण, अग्नी अन उपस्थित समाज यांना साक्षी ठेवून संपन्न होणाऱ्या विवाहविधीस धर्मशास्त्रात मानाचे स्थान आहे. तसेच दानातील महान पुण्यकारक असे जे 'कन्यादान' त्याचेही महतभाग्य याच विवाह विधीद्वारे वधुपित्यास प्राप्त होते.


ज्या अनेक महत्त्वपूर्ण अन आवश्‍यक विधिसंस्कार यातून हा विवाहविधी साजरा होतो तो पुढीलप्रमाणे :-


पत्रिका आणि पसंती : अनुरूप वधू-वरांची निवड करीत असताना दोघेही परस्परांना शिक्षण, रूप, सांपत्तिक स्थिती या गोष्टींतून किती व कसे अनुरूप आहेत, हे पाहत असतानाच- उभयतांचे गण, गोत्र, गुण-मिलन अन चंद्रबल, लाभालाभ यांचा विचार पत्रिका पाहणे यात मोडतो. अन एकदा का ब्राह्मण, गुरुजी, ज्योतिषी यांच्याकडून पत्रिका जुळत असल्याचे समजले, वधू-वरांची व उभय घराण्यांची पसंती झाली, की मग प्रारंभ होतो पुढील कार्यक्रमांना!


प्रत्यक्ष लग्नाआधी एखादा चांगला दिवस पाहून वराकडील मंडळी वधूकडे जाऊन तिला समारंभपूर्वक कुंकू लावून साडी भेट देतात. या समारंभात उभय वधू-वरास यथोचित भेटवस्तूही देतात. तसेच पुढील कार्याच्या याद्या करणे, हळद फोडणे हे कार्यक्रमही याच वेळी करतात. या प्रारंभीच्या परिचय कार्यक्रमांची सांगता चहा-पान, फराळ याचबरोबर पेढेवाटपाने होते. वधूला साडीबरोबरच पेढ्याचा पुडा देतात अन म्हणूनच हा प्रसंग साखरपुड्याच्या गोडीने सर्वांच्या लक्षात राहतो.


पत्रिका : पसंती अन साखरपुडा झाला, की एकच धावपळ चालू होते अन मग वेध लागतात ते प्रत्यक्ष लग्नाच्या दिवसाचे.


सीमांत-पूजन : लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री हा कार्यक्रम कार्यालयात साजरा होतो. पूर्वी वरपक्षाकडील मंडळींचे वधूपक्षाकडील मंडळींकडून गावच्या सीमेवर हे स्वागत पूजन होत असे. त्यावरून त्याचे नाव सीमांत-पूजन असे पडले आहे. त्यामागचा आणखी एक गूढार्थ असा, की आता उभय पक्षांकडील सीमांचा अंत होऊन दोघेही एकत्र येत आहोत अन पुढील कार्य हे समजूत, एकोपा, प्रेम अन जिव्हाळ्याने संपन्न करायचा आहे.


याच वेळी होणाऱ्या धार्मिक विधीचा नीट साधक-बाधक विचार केला, तर त्यालाच "श्रीमंत' किंवा "श्री' पूजन असेही मानणे योग्य ठरेल. कारण वधुपिता हा अनुरूप योग्य अशा त्या श्रीमानास आपण आपली कन्या प्रदान करत असतो ना!


घाणाभरण अन हळदी समारंभ : पूर्वी हे विधी विवाहाच्या आधी होत असले, तरी सध्या मात्र त्यामागची भावना, महत्त्व अन शास्त्र लक्षात घेता या गोष्टी विवाहाच्या दिवशीच कार्यालयात पहाटे केल्या जातात. आंब्यांच्या पानांना सुशोभित केलेल्या दोन मुसळांचे पूजन अन घाणाभरण्याच्या ओव्या म्हणत सुवासिनींद्वारे हा घाणा भरला जातो. त्याच मुसळांनी उखळ किंवा रोळीत उडीद, हळकुंड, सुपारी व तांदूळ कांडतात.
घाणाभरणानंतर त्यातीलच हळद वधू-वरांना लावतात. वधूस हळद लावून मंगलस्नान घालतात. वराकडून आलेली हळद वधूस लावण्याची जी पद्धत आहे, तीच या प्रकारच्या "उष्टी हळद' या नामाचे मर्म सांगून जाते.

देवदेवक/ पुण्याहवाचन : शास्त्रोक्त संकल्प, गणेशपूजा देव-देवक प्रतिष्ठापना, स्वस्तिवाचन, मातृका पूजन इ. गोष्टी ज्या कार्यक्रमात विधिपूर्वक केल्या जातात, त्यालाच देवक ठेवणे असे म्हणतात. हा विधी उभय पक्षांना वेगवेगळा करायचा असतो. याच वेळी यजमानास व नवरा-नवरीस जवळच्या व घरच्या आप्तेष्टांनी आहेर करायचा असतो. त्यालाच "घरचा आहेर' असेही म्हणतात.

गौरीपूजन : विवाहास सजून, नटूनथटून तयार झालेली नववधू बोहल्यावर येण्यापूर्वी जे गौरीहरांचे पूजन केले जाते त्यालाच गौरीहरपूजन असे म्हणतात. चौरंग किंवा पाटावर गौरीहर यांच्या प्रतिमा ठेवून त्याचे पूजन वधूने अक्षता समर्पित करीत व "हे गौरीमाते, मला सौभाग्य, सुख व संतती दे' अशी प्रार्थना करीत पूर्ण करायचे असते.

मंगलाक्षता आणि शुभमंगल सावधान : सुशोभित विवाह मंडपात वर येताच "मुलीचे मामा! मुलीला आणा' ही सूचना दिली जाते. अक्षतांचे वाटप होते. वधू-वरांच्या हाती पुष्पमाला देऊन त्यांना परस्परांसमोर दृष्टादृष्ट न होईल अर्थात अंतरपाट मध्ये धरून उभे केले जाते. दोघांच्याही मागे जवळचे नातेवाईक तसेच करवल्याही उभ्या असतात. मुहूर्ताच्या थोडे आधीच ईश-वंदना, शुभाशीर्वाद- अभीष्टचिंतनपर, काव्यात्मक जे भावप्रदर्शन केले जाते- तेच मंगलाष्टक गायन.
नंतर नियोजित मुहूर्त समयाला "तदेव लग्नं....' या मंगलाष्टकाने सांगता करीत शास्त्रोक्त मंत्रोच्चारांनी विवाह संपन्न केला जातो. अंतरपाट दूर केला जातो. वधू-वर परस्परांना पुष्पमाला घालतात. बॅंड वाजंत्री वाजते आणि टाळ्यांच्या गजरात लागले लग्न... झाला विवाह संपन्न याची ग्वाही मिळते.

कन्यादान : लग्नानंतर पूर्वाभिमुख उभ्या असणाऱ्या वराच्या ओंजळीत वधूपिता पाण्याची धार धरतो, ते पाणी वधूची आई घालते. त्या वेळी कन्यादानाचा मंत्रोच्चार होतो व "मी माझ्या कन्या आपल्याला दान देतो आहे' असे वधूपिता म्हणतो. तसेच या कन्यादानाची स्वीकृतीही तेथेच वरास द्यावी लागते. याच वेळी "धर्मेच, अर्थेच, कामेच नातिचरामि' असे अभिवचनही वरास वधूपित्याला द्यावे लागते.

कंकण बंधन व लाजा होम : कन्यादानानंतर ब्राह्मण, पुरोहित हे वधुवरांना कंकण बंधन करतात. त्यासाठी दुधात भिजवलेले सूत, दुहेरी सूत वराच्या कंठीजवळ वेष्टित असते. ते वधूच्या डाव्या मनगटावर बांधतात. तर वधूच्या कमरेजवळ वेढलेले सूत वराच्या उजव्या मनगटावर बांधतात. हे एक मंत्रोक्त नाजूक प्रीतीधाग्याचे अतूट बंधन असते. त्याच वेळेस वर वधूस सौभाग्याचे लेणे देतो. अर्थात मंगळसूत्र गळ्यात घालतो.

या वेळी वधू-वराने एकमेकांस डोके लावण्याचा जो प्रघात आहे, त्यामागे इथून पुढील भावी आयुष्यात परस्परांना एकमताने व एकविचाराने चालण्याची ग्वाही अभिप्रेत आहे.

त्यानंतर योनक नावाच्या अग्नीला तुपाची आहुती व वधूच्या भावाने बहिणीच्या हाती दिलेल्या लाह्या या वराने आपल्या हाती घेऊन त्या मंत्रोच्चारानुसार अग्नीस अर्पण करायच्या असतात. कानपिळीचा विधी येथेच संपन्न होतो. त्या वेळी अग्नीसाक्षीने आम्ही उभयता परस्परांवर प्रेम करून व सदैव एकमेकांच्या बरोबर निष्कपटपणे वागू, अशी शपथ घ्यावयाची असते.

सप्तपदी : "सात पाऊले संगती तुझ्या' असे म्हणत विवाह होमाच्या जवळ मांडलेल्या तांदळाच्या सात छोट्या छोट्या ढिगांवरून वरामागून वधू चालत जाते. ही सात पावलांची चाल सप्त जन्मांतरीच्या एकोप्याची व एकत्र वाटचालीची प्रतीकात्मक साक्ष असते. कार्यालयातील शेवटचा कार्यक्रम म्हणजे जेवण. या वेळी वधू पक्षाकडील मंडळी वर पक्षाकडील वडीलधाऱ्या मंडळींना मुलीची नीट काळजी घेण्याची व संगोपन करण्याची विनंती करतात.

गृहप्रवेश अन लक्ष्मीपूजन : आपल्या संस्कृतीप्रमाणे नवदांपत्यास "लक्ष्मीनारायण' मानण्याची पद्धत आहे. ज्या वेळी ही नूतन वधू आपल्या सासरी म्हणजे नवऱ्याचा घरात प्रवेश करते, त्याला गृहप्रवेश असे म्हणतात.

उंबरठ्यावरचे तांदळाचे माप लवंडून त्या नववधूने लक्ष्मीच्या सोनपावलांनी सुख-समृद्धीसह त्या घरात प्रवेस करावा, असाच या प्रथेमागचा खरा भावार्थ आहे. त्यानंतर घरी आलेल्या त्या गृहलक्ष्मीचे यथोचित पूजन करमे अन मग भरल्या तांदळाच्या ताटात सोन्याचा अंगठीने पुढील वैवाहिक जीवनातील तिच्या पतीच्या आवडीचे नाव लिहिले जाते. ते नावच तेथून पुढे ती सौभाग्यवती म्हणून धारण करते.

* व्रत वटपौर्णिमेचे *

* व्रत वटपौर्णिमेचे *


ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया वटसावित्री व्रत करतात. यंदा हा दिवस बुधवार दि. 18 जून 2008 रोजी येत आहे. मुलीचे लग्न झाल्यानंतर तिने आपले सौभाग्य कायम राहावे म्हणून हे व्रत अवश्‍य पाळले पाहिजे असा दंडक आहे.
सावित्रीचा पती सत्यवान वटवृक्षाच्या झाडाखाली गतप्राण झाला व तो पुन्हा त्याच वडाच्या झाडाखाली जिवंत झाला म्हणूनच त्या झाडाची पूजा करण्याची प्रथा पडली. या दिवशी सर्व सौभाग्यवती स्त्रिया उपवास करून वटसावित्रीचे व्रत करतात. त्यावेळी वडाच्या झाडाची पूजा करतात. शहरात वडाचे झाड नसल्यास वडाची फांदी आणून तिची पूजा करतात, अशा प्रकार सर्व सौभाग्यवती आपापल्यापरीने हे व्रत पूर्ण करतात आणि आपल्या पतीला उदंड आयुष्य मागतात.


वटवृक्षाशी संबंधित सावित्रीची पौराणिक कथा आहे ती अशी.
मद्रदेशाचा राजा अश्वपती याने आपली उपवर कन्या सावित्रीच्या लग्नाची तयारी थाटात केली. सावित्रीने आपणच आपल्या पतीची निवड केली होती. सावित्रीच्या लग्न सोहळ्याने मद्रदेशातील प्रजेला आनंद झाला. राजधानीत सर्वत्र आनंदोत्सव लगीनघाई सुरू झाली. नारदमुनींच्या कानावर ही वार्ता पडताच त्यांची स्वारी मद्रदेशी राजप्रासादात आली. ते सावित्रीला म्हणाले, "बाळ सावित्री, पती म्हणून तू सत्यवानाची निवड केलीस खरी. पण त्याचे वडील द्युमत्सेन हे वृद्ध आणि अंध असून त्यांचे राज्य शत्रूने घेतले आहे. सत्यवानाला आपल्या पित्याबरोबर वनवास प्राप्त झाला आहे. तू त्यांच्याशी लग्न करून वनवासात का राहणार आहेस?''


त्यावर सावित्री म्हणाली, ""मुनीवर केवळ ऐश्वर्यात राहूनच विलास भोगणे मला रुचत नाही. वनवासातील कष्टमय जीवनातच मला खरा आनंद लाभेल. मला सत्यवानच पसंत पडले आहेत.''
""पण सावित्री, तो सत्यवान अल्पायुषी आहे. लग्नानंतर बरोबर एक वर्षाने त्याचा मृत्यू होणार आहे, तेव्हा तू काय ते ठरव,'' नारदमुनी सांगत होते.


पण सावित्रीची निष्ठा अढळ होती. तिचा निश्‍चय पक्का होता. "काहीही असले तरी मी सत्यवानाशीच विवाह करणार,' हा तिचा संकल्प पाहून अश्वपती राजाने सावित्रीचा विवाह सत्यवानाशीच लावून दिला.


सावित्री सासरी अत्यंत साधेपणाने राहात असे. वृद्ध सासुसासरे यांची ती मनोभावे सेवा करी. आपल्या सतत कष्टांनी आणि प्रेमळ वागणुकीने ती सत्यवानालाही अत्यंत प्रिय झाली.
वनवासातील गोड सहवासात वर्षे संपत आले सावित्रीला नारदांच्या त्या भविष्यवाणीची आठवण होतीच तिने खडतर व्रत केले, उपवास केले. रात्रंदिवस परमेश्वराची प्रार्थना केली आणि आपल्या पतीचे मरण टाळावे, त्याचे आयुष्य वाढावे म्हणून तिने सतत उभे राहून परमेश्वराजवळ हट्टच धरला.


एकेदिवशी सत्यवानाबरोबर सावित्रीही वनात गेली. त्या दोघांनी कंदमुळे जमवली. समिधांसाठी लाकडे तोडण्यास सत्यवान वटवृक्षावर चढला. फांदीवर कुऱ्हाड चालवू लागला. पण त्या नादात तो धडकन खाली पडला आणि गतप्राण झाला. सावित्रीने हंबरडा फोडला. ""नाथ मला पण येऊ द्या तुमच्या बरोबर,'' आणि तीही बेशुद्ध पडली. तिच्या आत्म्याला पतीची ती दिव्य प्राणज्योत स्पष्ट दिसत होती. ती साध्वी पतिव्रता होती. व्रतांच्या पुण्याईमुळे तिला ते सर्व दृश्‍य दिसत होते. ती सत्यवानाच्या प्राणज्योतीच्या मागोमाग जाऊ लागली. तेव्हा यमराज म्हणाले, ""बाळे, तुला या सत्यवानाच्या प्राणाबरोबर स्वर्गात येता येणार नाही. मागे फिर आणि त्यांच्या देहाचे अंत्यसंस्कार कर?''


""पण तात, (यमराज) मी पतीशिवाय पृथ्वीवर कशी राहू? मला माझे पती परत द्या म्हणजे मी परत जाते. माझा हा हट्ट आपण पुरवाच!'' असे सावित्री म्हणाली. पतीच्या प्राणासाठी तिने यमराजांकडे खूप आर्जव केले. ते पाहून यमराज म्हणाले, ""मुली, तुझ्या पतीनिष्ठेबद्दल धन्यवाद! पण पतीशिवाय अन्य मागणी माग. मी तो तुझा हट्ट अवश्‍य पुरवीन ''
मग सावित्रीने आपल्या सासऱ्याला दृष्टी मागितली त्यांचे गेलेले राज्य परत मागितले. आपल्या पित्याला पुत्र मागले आणि शेवटी आपणही पुत्रवती व्हावे, असा आशीर्वाद यमाजवळ मागितला.
सावित्रीच्या विनयशील आणि मधुर बोलण्यावर यमराज प्रसन्न झाले. पतीशिवाय तिच्या त्या अन्य मागण्या त्यांनी भराभर कबूल केल्या आणि शेवटी तिला, ""पुत्रवती भव'' असा आशीर्वाद देऊन यमराज फसले. सावित्रीने मोठ्या खुबीने सत्यवानाचे प्राण परत मिळविले. सत्यवान उठला सावित्री शुद्धीवर आली. नंतर दोघे आनंदाने आश्रमात आले.



त्यानंतर सावित्रीने राजधानीतील सर्व सुवासिनी स्त्रियांसह वनातील त्या सौभाग्यदायी वटवृक्षाची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली. तिने सुरू केलेली ही प्रथा दर साल ज्येष्ठ पौर्णिमेला सर्वत्र चालू आहे.


सावित्रीचे नाव माहीत नाही, अशी एकही स्त्री सापडणे शक्‍य नाही. पूर्वी पुष्कळ स्त्रिया पतिव्रता म्हणून नावाजलेल्या होत्या. परंतु एकीच्याही नावाने व्रत करण्याची रीत पडली नाही, यावरून सावित्रीची योग्यता सर्व स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे हे उघडच दिसते. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीस नमस्कार केला तर, "जन्म सावित्री हो' असा आशीर्वाद देत असत.


यमाच्या पाशातून पतीला सोडविणाऱ्या सावित्रीने त्याच्या बरोबर विवाह करण्यासाठी सर्व ऐश्वर्य सोडून दिले. पूर्वी पतीला दैवत समजून त्याची सर्व सुखदु:खे सोसण्यास तयार असणाऱ्या, पतीच्या प्रत्येक कार्यास मदत करणाऱ्या व सासुसासऱ्यांना मातापित्यांच्या ठिकाणी मानणाऱ्या स्त्रिया होत्या. त्यामुळे आपला समाज बराच भरभराटीस पोचला होता. परंतु हल्लीच्या काळी याच्या उलट स्थितीमुळे समाजाची अवनती होत चालल्याचे दिसते.

सर्व स्त्री-पुरूषांनी प्रेमाने, नीतीने, सतधर्माने वागले पाहिजे. नुसत्या पूजनाने किंवा उपासाने खरे श्रेय मिळणार नाही. अखंड सौभाग्य प्राप्त होण्याकरिता प्रत्येक आर्य स्त्रीने "सावित्रीव्रत' अवश्‍य करावे.

कधी कोनावर प्रेम केले असेल तर वाचुन बघाच......

कधी कोनावर प्रेम केले असेल तर वाचुन बघाच......

    "Half the truth is often the whole lie"
   

        तुझ्या रुपात मन कैद माझे झाले.
        तो कविता वाचत होता.
        "गप रे" ति वैतगली होति.
        जरा सिरीयस बन. २ वर्षे झालीत..
        बाबा मागे लागलेत लग्नासाठी..

        माझा हो कळव.. तो हसत म्हणाला..
        अन काय कळवणार? तुला ना नोकरी,
        ना काहि व्यवसाय. अरे लग्न म्हणजे गंमत नाहि.
        अग गंमतच आहे. लग्न म्हणजे सहजिवन, प्रेम,
        एकमेकात आडकण.लग्न म्हणजे संलग्न.

        वेडा आहेस. अरे लग्न म्हणजे संसार,
        म्हणजे घर, दुध, किराणा, मुल,लग्न म्हणजे पैसा..ति म्हणाली
        हातात हात तुझा, अन तुझी साथ. पैसा येइल. येतो. तो म्हणाला
        पैसा म्हणजे परसातल प्राजक्ताच झाड नाहि.
        हालवल कि फुलांनी आंगण भरुन जात..तिन फटकारल..

        अग पण, तो बोलायच्या आतच ति म्हणाली..
        पैसा कि प्रेम हा वाद विवाद कालबाह्य आहे..
        प्रेमाच्या जागी प्रेम आहे, अन पैसा त्याच्या जागि.
        तु मल खुप आवडतोस.. पण तु मला विचार करुन निर्णय दे.
        तिन अल्टिमेटम दिला..

        1४ फेब्रुवारी चा दिवस होता आज खिशात पैसे होते.
        दिवस तिच्या बरोबर मजेत घालवायचा होता.
        त्यान तिला फोन केला.बर झाल, फोन केलास,
        मला पण तुझ्याशी बोलायच आहे.ति म्हणाली.
        नो प्रोब्लेम.. ताज मधे भेटु. काय?.. ति उडालीच.

        ताज च्या थंडगार वातावरणात, ति सुखावलि होति.
        मग काय ठरल?.तिन विषयाला हात घातला.
        तो बोलतच नव्हता. मी थांबु शकत नाहि.
        हि आपली शेवटची भेट.. तिच्या बोलण्याला धार होति..

        तो आतुन तुटत चालला होता..प्लिज..
        अरे प्लिज काय? सारच कठीण आहे.ति म्हणाली.
        मी निघते? ..प्लीज थांब, मला एक संधी दे..तो म्हणाला.
        तु फक्त एक वर्ष दे मला, तुल पाहिजे तेवढा पैसा देतो...तो म्हणाला.

        ति खळखळुन हसली." वेडा रे"अरे पैसा म्हणजे?...
        आय नो. त्यान वाक्य तोडल."किति पैसे लागतात संसाराला?
        लाखो रुपये ति म्हणाली..ठीक आहे. एक डिल.तो म्हणाला.
        आपण पुढच्या 1४ फेब्रुवारीला आपण इथच, ताज मधे,संध्याकाळी. ७ ला भेटु.
        अन काय करु..तिन विचारल..
        मी त्या दिवशी तुझ्या पायावर ७५ लाख रुपये ओतिल...तुला संसारा साठी.

        त्या चित्रपटांत हिरो हिरॉइन ला नोटांनी अंघोळ घालतो तशी.अंघोळ घालीन...
        तो हसत म्हणाला."मॅड आहेस." पण म्हणुनच तु मला आवडतो.ति..
        पण वचन दे, वाट पहाशील म्हणुन.. तो म्हणाला.
        ठिक आहे, पण ७५ रुपये तरी आणशील अस वाटत नाहि. ति हासली. .....
        continue.....


ठिक आहे, पण ७५ रुपये तरी आणशील अस वाटत नाहि. ति हासली.

        1४ फेब्रुवारी तो तिचि ६ वाज ल्या पासुनच वाट पहात होता.
        तेच टेबल होत, मागच्या वर्षीच, ति ये‌इल? तो अस्वस्थ होता
        ७ वाजायला आले होते, अन तेवढ्यात ति आत येताना दिसली.
        तिच्याशी नजरानजर होतच त्यान हात हलवला.
        हाश हूश करत ति समोरच्या खुर्चीवर बसली.

        कशी आहेस? फार गरम होत आहे. पहिल पाणी पिते.
        म्हणत उठुन ति त्याच्या समोरच्या ग्लास घ्यायल वाकली.
        ति वाकली असताना, त्याला ब्ला‌उज मधे लपवलेल्या मंगळसुत्रचा पदर दिसला.
        अग मी मागवतो म्हणेपर्यंत तिन ग्लास तोंन्डाला लावला होता.

        अरे फार पाणी पाणी झाल होत.. हं आता बोल.
        काय बोलु? तुच सांग. तिच्याकड बघत तो म्हणाला.
        मग काय? कुठे आहे ७५ लाख? ति हसत म्हणाली..
        त्याचा चेहेरा पड्ला होता., नाहि जमल, तु म्हणालीच तेच खर.
        ७५ लाख काय ७५ रु जमले नाहि. पैसा मिळवण कठिण आहे..

        जा‌उ देत, मला माहित होत, ति समजावणीच्या स्वरांत म्हणाली.
        मला पण तसच वाटत होते. पण म्ह्टल तुला शब्द दिला होता...
        तो बघत होता..अजुन काय? पडलेल्या चेहे~यानि तो म्हणाला.
        सांगु ति म्हणालि.. अरे माझ लग्न झाल, घरचे मागे लगलेच होते.
        तो बॅन्केत आहे, १ बेडरुमच घर आहे... तुझ अस.. ति म्हणाली. सॉरी..

       
तुझ खर आहे., तु ठीकच केल, माझ्याबरोबर.... वायाच गेल असत. तो म्हणाला.. ठीक आहे. मी निघते, तुला आता अस भेटण बर नाहि
        . निघते.. ति म्हणाली.. तो तिच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता..

        तो बराच वेळ बसुन होता. सार संपल होत.
रुम च्या नोकरानि टॅक्सीत सामान भरल..
        सर कुठे? टॅक्सी ड्रायव्हर ने विचारले.
        सहारा एयर पोर्ट. ईंटर नॅशनल टर्मीनल.


        टॅक्सी वेगात चालली होति,
        गार हवेच्या सपक्यान डोक शांत होत होत.
        विमान तळावर टॅक्सी थांबली,
        त्यान ट्रॉलीत लगेज भरल.व भाड देवुन तो निघाला,

        सर,टॅक्सी ड्रायव्हर ने हाक मारली,
        सर, तुमची बॅग राहिली आहे,
        त्यान टॅक्सी ड्रायव्हर कड बघितल, अन म्हणाला
        बॅग तुला राहु देत, त्यात ७५ लाख रुपये आहेत.
        नाहितरी, मला आता त्याचा काहिच उपयोग नाहि,
        ड्रायव्हर बराच वेळ त्याच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता
       
        कडु गोड आठवणीत तुझ्या साठव मला
        मैत्रीचा हात हवा असल्यास आठव मला
        माझ्या वाटेचा आनंद तुझ्याकडे ठेव
        तुझ्याकडे काही दु:ख असतील तर पाठव मला.....
        आधी विचार करा, मग कृती करा!!!

उत्तम मिसळ मिळणारी ठिकाणे

उत्तम मिसळ मिळणारी ६० ठिकाणे
१) अण्णा बेडेकर, पुणे
२) मनशक्ती के॑द्र, लोणावळा
३) मामलेदार, ठाणे
४) मूनमून मिसळ, डो॑बिवली
५) संजिवनी- माडिवालेकॉलनी, टिळक रोड
६) रामनाथ-साहित्य परिषदे जवळ ,टिळक रोड
७) श्री- शनिपारा जवळ
८) नेवाळे- चिंचवड
९) जयश्री- बजाज ऑटो समोर अकुर्डी.
१०) दत्त स्नॅकस , पळस्पे फाटा.
११) कुंजविहारी, ठाणे स्टेशन
१२) जुन्नर बस स्थानक..
१३) फडतरे, कलानगरी.
१४) अनंताश्रम, जेल रोड, इंदौर
१५) गोखले उपहार गृह, ठाणे
१६) भगवानदास, नाशिक
१७) फडतरे मिसळ कोल्हापुर
१८) गरवारे कॉलेज समोर काटाकिर्र, पुणे
१९) प्रकाश, दादर
२०) दत्तात्रय, दादर
२१) वृंदावन, दादर
२२) आस्वाद, दादर
२३) आनंदाश्रम, दादर
२४) मामा काणे
२५) आदर्श, दादर
२६) समर्थ दादर(पूर्व)
२७) पणशीकर (गिरगाव)
२८) विनय (गिरगाव)
२९) बालाजी स्नँक सेंटर चिंचवड
३०) शामसुंदर- सातपुर एम आय डी सी ( अतिशय सुंदर मिसळ) नाशिक
३१) अंबिका - पंचवटी कारंजा ( काळ्या मसाल्याची मिसळ) नाशिक
३२) तुषार - कोलेज रोड (गोड ब्राह्मणमिसळ) नाशिक
३३) कमला विजय - दहिपुल (ब्राह्मणमिसळ) नाशिक
३४) गारवा - अंबड (लाल मिसळ) नाशिक
३५) अलंकार - मेनरोड ( मिसळी पेक्षा वडारस्सामस्त) नाशिक
३६) गुरुदत्त- शिंगाडा तलाव ( कच्चा मसाला मिसळ) नाशिक
३७) मिसळपाव सेंटर - नेहरु उद्यान (रिक्षावाल्यांचा फर्स्ट चोइस) नाशिक
३८) श्रीकृष्ण - तुळशीबाग, पुणे
३९) वैद्य उपाहार गृह - फडके हौद चौकाजवळ, बुधवार्/रविवार पेठ , पुणे
४०) खासबागचीमिसळ कोल्हापुर
४१) चोरगे मिसळ कोल्हापुर
४२). बावड्याची मिसळ कोल्हापुर
४३) मोहन ची मिसळ कोल्हापुर
४४) टेंबे उपहारगृह- ठाकुरद्वार,
४५) छत्रे उपहारगृह- मुगभाट लेन च्या दारात.
४६) प्रकाश (जोगळेकर), सिक्कानगर - फडकेवाडी मंदिरा समोर
४७) सर्वोदय लंच होम ... करि रोड पुला खाली (डिलाइल रोडची बाजू)
४८) लोअर परळ स्टेशन (पश्चिम) च्या बाहेर पडल्यावरनेताजी लंच होम
४९) बाजीराव रोड वर भिकारदासमारोती जवळ तापीकर काकांचे होटेल
५०) जुन्नर मध्ये एक उंब्रज नावाचे छोटे गाव आहे. तिथे "दांगटांची मिसळ"
५१) पेण ला चावडी नाक्यावरतांडेल ची मिसळ
५२) हॉटेल ज्योती, सोलापुर - पुणे महामार्गावरील भिगवण गाव
५३) बावड्यातली मिसळ कोल्हापुर
५४) बादशाहि मिसळ, पुणे
५५)  अलका टॉकीजसमोर कोल्हापूर मिसळ खाल्ली
५६)  नगर रस्त्यावर सरदवाडीची मिसळ
५७) शनिवार पेठेतील "रामदास'
५८) वायंगणकर(मारुती मंदिर) रत्नागिरी
५९) दत्त मिसळ (टॉकीजवरची / गांध्याची मिसळ) रत्नागिरी