Friday, December 31, 2010

माझ्या सर्व मित्रांना नवीन वर्षाचा हार्दिक शुभेच्छा..........


माझ्या सर्व मित्रांना नवीन वर्षाचा हार्दिक शुभेच्छा..........

सरत्या वर्षाने दिलेले दुःख विसरून, मिळालेल्या सुखाच्या आठवणी बरोबर
घेऊन, जुनी नात्यांची हिरवाई जपत, नवीन नात्यांची पालवी घेवून, पूर्ण न
झालेले संकल्प या वर्षी पूर्ण होण्याची मनीषा बाळगत नवीन वर्षात प्रवेश
करू यात. .हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखासमाधानाचे, समृद्धीचे आणि
......शांततेचे जावो हिच सदिच्छा!!

Wednesday, December 22, 2010

काही नाती


काही नाती मिरवायची असतात; मेडलसारखी

काही दाखवायची असतात; दातांसारखी

काही नाती भोगायची असतात; सम्राटासारखी
...

काही नाती वाहायची असतात; ओझ्यांसारखी

काही नाती ओळखायची असतात; गुपितांसारखी

काही समजून घ्यायची असतात; प्रेमासारखी

काही नाती जोडायची असतात; धाग्यांसारखी

काही पेलायची असतात; गोवर्धनासारखी

नातीगोती हातात नसतात; नशिबासारखी

म्हणूनच काही नाती विसरायची असतात; दुःखासारखी

Tuesday, December 21, 2010

जग जवळ येत चाललय

जग जवळ येत चाललय
पण माणसे दुरावत चालली आहेत
प्रत्येकाचा बँक ब्यालेन्स वाढत चालला आहे
पण माणुसकी चे खाते रिकामे होत चाल ले आहे ...........!

Thursday, December 9, 2010

का बरं मला तुझी आठवण यावी...?

का बरं मला तुझी आठवण यावी...?

का बरं मला तुझी आठवण यावी...?
जीवाची अशी घालमेल व्हावी....?
सारं काही जवळ असुनही,
दूर असल्याची जाणीव व्हावी.....?

आठवताहेत ते क्षण,
जांच्यावर जगतेय अजुनपण,
सतत तुला माझ्याकडे आणि माला तुझ्याकडे,
खेचणारे असे हे क्षण

आठवतेय तो सारा पसारा,
जो, पसरलाय सैरावैरा,
त्यातूनच तुझा तो इशारा,
तेव्हा अंगावर आलेला शहारा.....!

एवढे सर्व असुनही,
का बरं मला तुझी आठवण यावी...?
जीवाची अशी घालमेल व्हावी..........!

आठवतेय तुझं चिडणं - रागावणं,
मग स्वत:च बोलणं,
नाहीतर दोन - चार दिवस थांबून,
मी बोलतेय का हे बघणं......!

वाटतं ही वेळ अशी,
चुटकित सरून जावी,
आणि शेवटी कायमची,
आपली गाठभेट व्हावी.......!

Wednesday, December 8, 2010

Friday, December 3, 2010

तो आणि ती ( तेरा )

प्रेमातले सॉरी-थॅंक्‍यू (तो आणि ती)
मिथिला आणि नचिकेतमधील मोकळ्या संवादातील किंचित अशा विसंवादानं गैरसमजुतीची ढगं तयार झाली. ती अधिक गडद होत गेली. एक दिवस त्या ढगांमधील मरगळ बाहेर आली. बोचरे शब्द कडकडत्या विजांच्या स्वरूपात झेपावले. दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. चूक कुणाची, या शुल्लक विषयाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं. दोघांची मनं दुखावली. पण दोघेही पुरते समजूतदार होते. नातं टिकवण्याचं कसब दोघांनी जोपासलं होतं. बघुया पुढे...----मिथिला अगदी मोकळ्या मनानं चूक कबूल करते. नचिकेतला चटकन सॉरी म्हणते. त्याच्या सॉरीची जराही वाट न पाहता. कारण नचिकेत कुणी परका व्यक्ती नसतो. त्याच्यासमोर माघार घेण्यास, आपली चूक कबूल करण्यास मग वेळ का लागावा! तिच्या मनात अहंकाराची बीजे नसतात किंवा मोठेपणाचा बडेजावही नसतो. नातं हे असंच असावं. अगदी थेट हृदयाला जाऊन भिडणारं. आपल्या हातून चूक घडली की नाही हे तपासत बसण्यापेक्षा पुढच्या व्यक्तीच्या अपेक्षांना प्राथमिकता देणारं. तेव्हाच ते काळाच्या कसोटीवर खरं उतरतं. त्यात जीव फुंकला जातो. तसं बघितलं, तर मिथिलाची चूक सॉरी म्हणण्याइतपत मोठी नव्हती. पण नचिकेत कदाचित त्याची अपेक्षा करीत असावा. ती केवळ नचिकेतला चांगलं वाटावं म्हणून सॉरी म्हणते. या सॉरीचा आणि दोघांमधील गैरसमजुतीचा जराही संबंध नसतो. पण नचिकेतचंही कुठेतरी चुकतं. त्यानं वापरलेले बोचरे शब्द आणि स्वतःहून केलेला गैरसमज यावर माफी क्रमप्राप्त आहे. जर मिथिला त्याच्या अपेक्षांवर खरी उतरण्यासाठी माघार घेऊ शकते, तर त्यानं मिथिलाची अपेक्षा नसतानाही माघार घेणं हे मोठेपणाचं लक्षण का ठरू नये...!

""मिथिला माझंच चुकलं. अगं मी रागाच्या भरात बरंच काही बोललो. मी असं करायला नको होतं. अगं माणसांकडून चुका होतात. त्या माणसांनीच समजून घ्यायच्या असतात. आणि आपण तर एकमेकांच्या अगदी जवळ आहोत. आपण एकमेकांना समजून घेणार नाही, तर कोण समजून घेणार. समजूतदारपणा आपल्या नात्याचा श्‍वास आहे, तो बेस आहे. तो मी कसाकाय गमावून बसलो. खरंच माझं चुकलं. सॉरी. एक्‍स्ट्रीमली सॉरी,'' नचिकेतनं माघार घेतली. त्याला थोडा विलंब झाला, पण तो अहंपणावर मात देणारा ठरला.

""अगं अशा आलतू-फालतू विषयांचे आपल्या आयुष्यात इश्‍यू होत गेले, तर नात्याला बळकटी कशी मिळणार. प्रेमात वारंवार एकसारख्या चुका होत गेल्या, तर कुणा एकाचं काही चुकतंय. पण जर एका चुकीवर एवढा गोंधळ झाला, तर त्यात नात्यातील फोलपणा उघड होतो. आपल्या नात्यातील कमकुवतपणाला मी सर्वस्वी जबाबदार आहे. हे मी एक्‍सेप्ट करतो. एक चूक ही नक्कीच अनावधानानं घडली असते. त्याला मागचा पुढचा विचार नसतो. आणि मी वेड्यासारखं ती चूक धरून बसलो. खरंच मिथिला मला माफ कर. माझं चुकलं. तू मला एकदा फोन केला नाही, तर मी भडकणं हे चुकीचच होतं. असं वारंवार घडलं असतं, तर ते तुझ्या निदर्शनास आणून देणं हे माझं काम होतं. आपल्या माणसावर भडकणं हे सर्वथा अनुचित आहे,'' नचिकेत अगदी कळवळून बोलत होता. त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. तसंच मिथिलाची फार मोठी चूक नसतानाही तिनं चटकन सॉरी म्हणणं अगदी जिव्हारी लागलं होतं.

""इट्‌स ओके नचिकेत. अरे नातं म्हटलं की लहान-मोठे रुसवे-फुगवे आलेच. आपलं तर प्रेमाचं हळवं नातं आहे. प्रेमात एकमेकांकडून फार एक्‍स्पेक्‍टेशन्स असतात. आणि ते पूर्ण झाले नाहीत, की प्रचंड जळफळाट होतो. नात्यात एक्‍स्पेक्‍टेशन्स राहणारच. पण ते पूर्ण झाले नाहीत किंवा त्यानुसार पुढील व्यक्ती वागला नाही की लगेच तणावाचं वातावरण तयार होणं हे बरोबर नाही. ते नात्याला मारक ठरतं. आणि शेवटी समजूतदारपणा म्हणजे नेमकं काय रे... दुसऱ्याला समजून घेणं, अडीअडचणीला त्याची ताकद होऊन त्याच्या बाजूनं खंबीरपणे उभं राहणं, त्याची दुःख आपलीशी करणं, आपल्या सुखात त्याला सामील करून घेणं यापेक्षा काही वेगळं नाही. मला तुझ्या सॉरीची अपेक्षा नव्हती. आणि प्रेमात कसलं आलंय, सॉरी आणि थॅंक्‍यू. आपलं नातं त्यापेक्षा मोठं आहे,'' मिथिलानं नकळत प्रेमाची परिभाषा मांडली. मनात असलं की जिभेवर येतं असं जे म्हणतात ते असंच असावं. सॉरीची फॉरमॅलिटी संपल्यावर दोघे कित्येक तास बोलत बसले. एकमेकांसोबत वेळ घालवायला, बोलायला दोघांना हे कारण पुरेसं होतं.

हवाहवासा विकेंड सरून आठवड्याच्या कंटाळवाण्या रूटीनला सुरवात झाली. वेळेवर येणारी कॅब पकडण्यासाठी सकाळी जिवाचा आटापिटा करणं. रात्री जागरण झालं असेल, तर कॅबमध्ये जरावेळ डुलकी काढणं. ऑफिसच्या गेटमधून आत प्रवेश करताना अगदी तुरुंगात जात असल्याचे भाव चेहऱ्यावर आणणं. दिवसभर जीव ओतून राबणं. सोबत चॅटिंग विंडोत विरंगुळा शोधणं. रात्री कॅबमधून घरी येताना पुन्हा एखादी डुलकी किंवा जिवाभावाच्या मित्र-मैत्रिणींसोबत मोबाईल फोनवर गप्पा किंवा सर्वांत बेस्ट म्हणजे रेडिओवर गाणी ऐकणं. घरी पोहचल्यावर दिवसभराची शिरशिरी अंगात मिरवत बिछ्यान्याला पाठ टेकवणं. आणि झोपण्याआधी विकेंडला किती दिवस शिल्लक राहिलेत, याची चाचपणी करणं. असे दिवसांमागून दिवस अगदी ""सुखात'' जात होते.
एक दिवस कॅबमध्ये मिथिला आणि आशय एकमेकांसोबत बोलत होते. तेव्हा आशयनं सहज विषय काढला. त्याच्या बोलण्यात जरा तणाव जाणवत होता.
""अगं मिथिला, तुला नचिकेतनं ऋतूजाबद्दल काही सांगितलंय का...! ती सध्या प्रचंड तणावाखाली आहे,'' आशयनं विषयाला तोंड फोडलं.

""नाही रे... काय झालंय,'' मिथिलाला माहीत असतानाही ती वेड घेऊन पेडगावला गेली. तिला आशयच्या तोंडून ऐकायचं असतं.

""अगं ऋतूजाचा बॉस तिला प्रचंड त्रास देतोय. तो मुद्दाम तिला जास्त काम देतो. डेडलाईन जवळ आली असेल, असं काम माथी मारतो. मग तिला काम करीत बसावं लागतं. कधी कधी तिला घरी जायला बराच उशीर होतो. तरीही ती काम पूर्ण केल्याशिवाय घरी जात नाही. पण याचं तिच्या बॉसला काहीच वाटत नाही. उलट मी असंही ऐकलंय की ती घरी जायला निघणार एवढ्यात तिचा बॉस अगदी वेळ साधून तिला काम सोपवतो. वेळोवेळी मार्गदर्शन न करता मुद्दाम कामात चुका शोधतो. तिला रागवतो. काही दिवसांपूर्वी तिला दोन दिवस सुट्या हव्या होत्या. तिच्या आतेबहिणीचं लग्न होतं. तर बुवानं त्या मान्य केल्या खऱ्या, पण तिला असं काम सोपवलं की त्याची डेडलाईन अगदी त्या सुट्ट्यांना क्रॉस करणारी होती. शेवटी तिला लग्नाला जायचा निर्णय कॅन्सल करावा लागला,'' आशय अगदी भराभरा सांगत होता.
 
मिथिलाला नचिकेतनं आधीच सगळं सांगितलं होतं. पण ऋतूजाला अतिरिक्त काम दिल्यानं किंवा बॉस त्रास देत असल्यानं आशयला काळजी वाटणं, हे तिला फार सुखावून गेलं. नचिकेतलाही माझी अशीच काळजी वाटेत असेल, तोही माझ्याबद्दल असाच विचार करीत असेल, असा विचार मनात डोकावून गेला. ती मनोमन शहारली. सुखावली. आशयचं बोलणं सुरूच होतं.
(क्रमशः)

हे लग्न झालेल्यांनी, न झालेल्यांनी आणि लग्न होणार असलेल्यांनी ......नक्कीच वाचा: विचार करा.

हे लग्न झालेल्यांनी, न झालेल्यांनी
आणि लग्न होणार असलेल्यांनी ......
नक्कीच वाचा: विचार करा.

एका रात्री मी घरी आलो ते मनाशी काही ठरवूनच.
जेवताना मी तिचा हात हातात
घेतला आणि म्हणालो, "मला तुझ्याशी काही बोलायचं आहे."
तिच्या डोळ्यांत वेदना उमटली;
तरीही ती शांतपणे जेवत होती,
सगळे शब्द जुळवून मी तीला  सांगितलं,
मला घटस्पोट हवाय."
तिने शांतपणे विचारल,- "का?"
तिचा प्रश्न मी टाळला, ती भडकली.
समोरच ताट तिने भिरकावून दिलं.
लग्न मोडायला नेमकं काय कारण आहे,
हे तिल जाणून घ्यायचं  होत;
पण माझं मन दुसऱ्या  स्त्रीवर आलय हे मि तिला
स्पष्टपणे सांगू  शकत नव्ह्तो.

माझा बँक ब्यालन्स, कार, घर, सगळ मी तिला देऊ केलं:
पण मी समोर केलेल्या घटस्पोटाच्या कागदाचे तिने तुकडे केले.

दुसऱ्या दिवसी तिने माझ्यासमोर घटस्पोटा विषयीच्या अटीचा कागद समोर केला.
तिला माझ्याकडून काहीही नको होते, फक्त एक महिन्याची नोटीस हवी होती आणि
या एक महिन्यात दोघांनीही नॉर्मल रहावं अशी तिची इश्च्या होती.
तिची कारणे साधी होती. महिन्या भरात आमच्या मुलाची परीक्षा होती
आणि त्याच्यावर काहीही परिणाम व्हायला नको होता.
तिची आणखी एक अट होती.
लग्नाच्या दिवसी मी तिला बेडरूम पर्यंत कसं उचलून नेलं होत.
त्याप्रमाणे रोज महिनाभर तिला न्यायचं होत तशी तिची अटच होती.
मला वाटलं तिला वेड लागलंय; पण महिना व्यवस्थित जावा यासाठी मी तिची अट मान्य केली.
घटस्पोटाच्या विचारामुळे अनेक दिवस माझा पत्नीसोबतचा संपर्कच झालेला नव्हता. त्यामुळे पहिल्या दिवसी बेडरूम पर्यंत तिला नेताना आम्ही दोघही फार अवघडून गेलो.
मी तिचा हात धरून बेडरूम पर्यंत नेतान माझ्या मुलाने
बघितलं आणि त्याला फार आनंद झाला.
दुसया दिवसी ती माझ्या छातीला टेकून होती.
आपण आपल्या बायकोकडे बरेच दिवस
नित बघितलेच नाही हे मला जाणवलं;
आणि तिचा सहवास मला अचानक हवाहवासा वाटू लागला. आपण हिच्या बाबतीत असा अचानक निर्णय का घेतोय,
असा प्रश्न पडला.
त्यानंतरच्या प्रत्येक दिवसी तिला उचलून किंवा सोबन बेडरूम पर्यंत नेताना आमच्यातली एक हवीहवीशी जवळीक वाढत असल्याचं मला जाणवलं.
रोजच्या प्रमाणे तिला अचानक उचलताना मला जाणवलं, तीच वजन कमी झालंय. हृदयातल्या वेदनाचां
हा परिणाम होता. मी आस्थेने तिच्या कपाळाला स्पर्श केला.
दिवसागणिक तिचं कमी होणारं वजन 
माझी काळजी वाढवत होत.  पण तिच्या अटीच
पालन करताना मला आंतरिक समाधान मिळत होत, आमच्यात काय घडतंय  याची कल्पना
नसतानाही आमचा मुलगा खूप खुश होता.
आमच्यात दुरावा निर्माण झाला होता कारण आमच्यातली जवलीकच संपली होती.
जी परत आयुष्यात येत होती.
महिन्याच्या शेवटच्या दिवसी - मी मनाशी निर्णय घेतला.  माझ्या प्रेयसीच्या घरी आलो आणि मी माझ्या पत्नीला घटस्पोट देऊ शकत नसल्याच स्पष्टपणे सांगितले.
ती चिडली, संतापली, पण आता मला काही यैकायाच
नव्हते.  माझ्या प्रिय पत्नीचा हात मला आता मरे पर्यंत सोडायचा नव्हता.
मी वेगाने CAR चालवत घरी आलो. 
माझ्या चेहऱ्यावर हसू होत.
हातात फुलांचा गुच्छ होता. मी बेडरूम मध्ये पोहचलो, तर... माझी प्रिय पत्नी बेडवर निष्प्राण पडलेले होती.
मुलाला जवळ घेऊन मी अनावर रडत सुटलो.
माझ्या प्रेमापायी तिने जीव दिला होता. ती असताना मी जे करायला हव ते केल नाही.
जे प्रेम , जी जवळीक तिला हवी होती ती मी तिला दिली नाही. आता माझे अश्रू तिला परत आणू शकत नव्हते.
पती-पत्नीच्या नात्यात कार, बंगला, प्रेयसी, पैसा काहीही महत्वाच नाही.
महत्वाच आहे ते प्रेम, जवळीक आणि विश्वास.

वाचा आणि विचार करा. स्वताला विचारा --- "
आपल वैवाहिक आयुष्य खरच सुखाचं आहे?"

या कहाणीचा एकच संदेश आहे.---

" जे आहे-- जे प्रेमात आहे,
जे प्रेमाचे आहेत ते प्राणपणाने सांभाळा.
नाही तर पश्याताप...
 

Wednesday, December 1, 2010

अजीबो गरीब प्राणी "GirlFriend"

अजीबो गरीब प्राणी "GirlFriend"

आज हम एक अजीबो गरीब प्राणी के बारे में पढायेंगे .

इस जंतु का नाम है "GirlFriend" .

ये अक्सर "Boyfriend" के साथ पाई जाती है !

इनका पोस्टिक आहार "Boyfriend" का भेजा होता है !

इनको अक्सर नाराज होने का नाटक करते हुए देखा जा सकता है ! पर अगर पैसे खर्च किये जाये तो फीर नाटक ख़त्म हो जाता है...

इस प्राणी का सबसे खतरनाक हथियार रोना और इमोशनली ब्लैक मेल करना होता है !

गर्ल फ्रेंड से ब्रेक अप पर टेंशन नाम की बीमारी हो जाती है, जिसका कोई इलाज नहीं.. ये ही एक ऐसा प्राणी है जिसपे कोई विस्वास नहीं करता है...

गर्ल फ्रेंड के लिए बॉय फ्रेंड कुछ भी कर सकता है, यहाँ तक की हस्ते हस्ते कुत्ता भी बनता है... इस प्राणी में बहुत सारे अवगुण फीर भी ये प्राणी इतनी आसानी से नहीं मिलता है, ये प्राणी भाव बहुत खाता है, पर इस प्राणी के पास होता कुछ भी नहीं है जो वास्तविक हो जिसपे भाव खाया जा सके...ये प्राणी नर प्राणी को बर्बाद करने में कोई भी कसर नहीं छोरता है.