Friday, December 31, 2010

माझ्या सर्व मित्रांना नवीन वर्षाचा हार्दिक शुभेच्छा..........


माझ्या सर्व मित्रांना नवीन वर्षाचा हार्दिक शुभेच्छा..........

सरत्या वर्षाने दिलेले दुःख विसरून, मिळालेल्या सुखाच्या आठवणी बरोबर
घेऊन, जुनी नात्यांची हिरवाई जपत, नवीन नात्यांची पालवी घेवून, पूर्ण न
झालेले संकल्प या वर्षी पूर्ण होण्याची मनीषा बाळगत नवीन वर्षात प्रवेश
करू यात. .हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखासमाधानाचे, समृद्धीचे आणि
......शांततेचे जावो हिच सदिच्छा!!

Wednesday, December 22, 2010

काही नाती


काही नाती मिरवायची असतात; मेडलसारखी

काही दाखवायची असतात; दातांसारखी

काही नाती भोगायची असतात; सम्राटासारखी
...

काही नाती वाहायची असतात; ओझ्यांसारखी

काही नाती ओळखायची असतात; गुपितांसारखी

काही समजून घ्यायची असतात; प्रेमासारखी

काही नाती जोडायची असतात; धाग्यांसारखी

काही पेलायची असतात; गोवर्धनासारखी

नातीगोती हातात नसतात; नशिबासारखी

म्हणूनच काही नाती विसरायची असतात; दुःखासारखी

Tuesday, December 21, 2010

जग जवळ येत चाललय

जग जवळ येत चाललय
पण माणसे दुरावत चालली आहेत
प्रत्येकाचा बँक ब्यालेन्स वाढत चालला आहे
पण माणुसकी चे खाते रिकामे होत चाल ले आहे ...........!

Thursday, December 9, 2010

का बरं मला तुझी आठवण यावी...?

का बरं मला तुझी आठवण यावी...?

का बरं मला तुझी आठवण यावी...?
जीवाची अशी घालमेल व्हावी....?
सारं काही जवळ असुनही,
दूर असल्याची जाणीव व्हावी.....?

आठवताहेत ते क्षण,
जांच्यावर जगतेय अजुनपण,
सतत तुला माझ्याकडे आणि माला तुझ्याकडे,
खेचणारे असे हे क्षण

आठवतेय तो सारा पसारा,
जो, पसरलाय सैरावैरा,
त्यातूनच तुझा तो इशारा,
तेव्हा अंगावर आलेला शहारा.....!

एवढे सर्व असुनही,
का बरं मला तुझी आठवण यावी...?
जीवाची अशी घालमेल व्हावी..........!

आठवतेय तुझं चिडणं - रागावणं,
मग स्वत:च बोलणं,
नाहीतर दोन - चार दिवस थांबून,
मी बोलतेय का हे बघणं......!

वाटतं ही वेळ अशी,
चुटकित सरून जावी,
आणि शेवटी कायमची,
आपली गाठभेट व्हावी.......!

Wednesday, December 8, 2010

Friday, December 3, 2010

तो आणि ती ( तेरा )

प्रेमातले सॉरी-थॅंक्‍यू (तो आणि ती)
मिथिला आणि नचिकेतमधील मोकळ्या संवादातील किंचित अशा विसंवादानं गैरसमजुतीची ढगं तयार झाली. ती अधिक गडद होत गेली. एक दिवस त्या ढगांमधील मरगळ बाहेर आली. बोचरे शब्द कडकडत्या विजांच्या स्वरूपात झेपावले. दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. चूक कुणाची, या शुल्लक विषयाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं. दोघांची मनं दुखावली. पण दोघेही पुरते समजूतदार होते. नातं टिकवण्याचं कसब दोघांनी जोपासलं होतं. बघुया पुढे...----मिथिला अगदी मोकळ्या मनानं चूक कबूल करते. नचिकेतला चटकन सॉरी म्हणते. त्याच्या सॉरीची जराही वाट न पाहता. कारण नचिकेत कुणी परका व्यक्ती नसतो. त्याच्यासमोर माघार घेण्यास, आपली चूक कबूल करण्यास मग वेळ का लागावा! तिच्या मनात अहंकाराची बीजे नसतात किंवा मोठेपणाचा बडेजावही नसतो. नातं हे असंच असावं. अगदी थेट हृदयाला जाऊन भिडणारं. आपल्या हातून चूक घडली की नाही हे तपासत बसण्यापेक्षा पुढच्या व्यक्तीच्या अपेक्षांना प्राथमिकता देणारं. तेव्हाच ते काळाच्या कसोटीवर खरं उतरतं. त्यात जीव फुंकला जातो. तसं बघितलं, तर मिथिलाची चूक सॉरी म्हणण्याइतपत मोठी नव्हती. पण नचिकेत कदाचित त्याची अपेक्षा करीत असावा. ती केवळ नचिकेतला चांगलं वाटावं म्हणून सॉरी म्हणते. या सॉरीचा आणि दोघांमधील गैरसमजुतीचा जराही संबंध नसतो. पण नचिकेतचंही कुठेतरी चुकतं. त्यानं वापरलेले बोचरे शब्द आणि स्वतःहून केलेला गैरसमज यावर माफी क्रमप्राप्त आहे. जर मिथिला त्याच्या अपेक्षांवर खरी उतरण्यासाठी माघार घेऊ शकते, तर त्यानं मिथिलाची अपेक्षा नसतानाही माघार घेणं हे मोठेपणाचं लक्षण का ठरू नये...!

""मिथिला माझंच चुकलं. अगं मी रागाच्या भरात बरंच काही बोललो. मी असं करायला नको होतं. अगं माणसांकडून चुका होतात. त्या माणसांनीच समजून घ्यायच्या असतात. आणि आपण तर एकमेकांच्या अगदी जवळ आहोत. आपण एकमेकांना समजून घेणार नाही, तर कोण समजून घेणार. समजूतदारपणा आपल्या नात्याचा श्‍वास आहे, तो बेस आहे. तो मी कसाकाय गमावून बसलो. खरंच माझं चुकलं. सॉरी. एक्‍स्ट्रीमली सॉरी,'' नचिकेतनं माघार घेतली. त्याला थोडा विलंब झाला, पण तो अहंपणावर मात देणारा ठरला.

""अगं अशा आलतू-फालतू विषयांचे आपल्या आयुष्यात इश्‍यू होत गेले, तर नात्याला बळकटी कशी मिळणार. प्रेमात वारंवार एकसारख्या चुका होत गेल्या, तर कुणा एकाचं काही चुकतंय. पण जर एका चुकीवर एवढा गोंधळ झाला, तर त्यात नात्यातील फोलपणा उघड होतो. आपल्या नात्यातील कमकुवतपणाला मी सर्वस्वी जबाबदार आहे. हे मी एक्‍सेप्ट करतो. एक चूक ही नक्कीच अनावधानानं घडली असते. त्याला मागचा पुढचा विचार नसतो. आणि मी वेड्यासारखं ती चूक धरून बसलो. खरंच मिथिला मला माफ कर. माझं चुकलं. तू मला एकदा फोन केला नाही, तर मी भडकणं हे चुकीचच होतं. असं वारंवार घडलं असतं, तर ते तुझ्या निदर्शनास आणून देणं हे माझं काम होतं. आपल्या माणसावर भडकणं हे सर्वथा अनुचित आहे,'' नचिकेत अगदी कळवळून बोलत होता. त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. तसंच मिथिलाची फार मोठी चूक नसतानाही तिनं चटकन सॉरी म्हणणं अगदी जिव्हारी लागलं होतं.

""इट्‌स ओके नचिकेत. अरे नातं म्हटलं की लहान-मोठे रुसवे-फुगवे आलेच. आपलं तर प्रेमाचं हळवं नातं आहे. प्रेमात एकमेकांकडून फार एक्‍स्पेक्‍टेशन्स असतात. आणि ते पूर्ण झाले नाहीत, की प्रचंड जळफळाट होतो. नात्यात एक्‍स्पेक्‍टेशन्स राहणारच. पण ते पूर्ण झाले नाहीत किंवा त्यानुसार पुढील व्यक्ती वागला नाही की लगेच तणावाचं वातावरण तयार होणं हे बरोबर नाही. ते नात्याला मारक ठरतं. आणि शेवटी समजूतदारपणा म्हणजे नेमकं काय रे... दुसऱ्याला समजून घेणं, अडीअडचणीला त्याची ताकद होऊन त्याच्या बाजूनं खंबीरपणे उभं राहणं, त्याची दुःख आपलीशी करणं, आपल्या सुखात त्याला सामील करून घेणं यापेक्षा काही वेगळं नाही. मला तुझ्या सॉरीची अपेक्षा नव्हती. आणि प्रेमात कसलं आलंय, सॉरी आणि थॅंक्‍यू. आपलं नातं त्यापेक्षा मोठं आहे,'' मिथिलानं नकळत प्रेमाची परिभाषा मांडली. मनात असलं की जिभेवर येतं असं जे म्हणतात ते असंच असावं. सॉरीची फॉरमॅलिटी संपल्यावर दोघे कित्येक तास बोलत बसले. एकमेकांसोबत वेळ घालवायला, बोलायला दोघांना हे कारण पुरेसं होतं.

हवाहवासा विकेंड सरून आठवड्याच्या कंटाळवाण्या रूटीनला सुरवात झाली. वेळेवर येणारी कॅब पकडण्यासाठी सकाळी जिवाचा आटापिटा करणं. रात्री जागरण झालं असेल, तर कॅबमध्ये जरावेळ डुलकी काढणं. ऑफिसच्या गेटमधून आत प्रवेश करताना अगदी तुरुंगात जात असल्याचे भाव चेहऱ्यावर आणणं. दिवसभर जीव ओतून राबणं. सोबत चॅटिंग विंडोत विरंगुळा शोधणं. रात्री कॅबमधून घरी येताना पुन्हा एखादी डुलकी किंवा जिवाभावाच्या मित्र-मैत्रिणींसोबत मोबाईल फोनवर गप्पा किंवा सर्वांत बेस्ट म्हणजे रेडिओवर गाणी ऐकणं. घरी पोहचल्यावर दिवसभराची शिरशिरी अंगात मिरवत बिछ्यान्याला पाठ टेकवणं. आणि झोपण्याआधी विकेंडला किती दिवस शिल्लक राहिलेत, याची चाचपणी करणं. असे दिवसांमागून दिवस अगदी ""सुखात'' जात होते.
एक दिवस कॅबमध्ये मिथिला आणि आशय एकमेकांसोबत बोलत होते. तेव्हा आशयनं सहज विषय काढला. त्याच्या बोलण्यात जरा तणाव जाणवत होता.
""अगं मिथिला, तुला नचिकेतनं ऋतूजाबद्दल काही सांगितलंय का...! ती सध्या प्रचंड तणावाखाली आहे,'' आशयनं विषयाला तोंड फोडलं.

""नाही रे... काय झालंय,'' मिथिलाला माहीत असतानाही ती वेड घेऊन पेडगावला गेली. तिला आशयच्या तोंडून ऐकायचं असतं.

""अगं ऋतूजाचा बॉस तिला प्रचंड त्रास देतोय. तो मुद्दाम तिला जास्त काम देतो. डेडलाईन जवळ आली असेल, असं काम माथी मारतो. मग तिला काम करीत बसावं लागतं. कधी कधी तिला घरी जायला बराच उशीर होतो. तरीही ती काम पूर्ण केल्याशिवाय घरी जात नाही. पण याचं तिच्या बॉसला काहीच वाटत नाही. उलट मी असंही ऐकलंय की ती घरी जायला निघणार एवढ्यात तिचा बॉस अगदी वेळ साधून तिला काम सोपवतो. वेळोवेळी मार्गदर्शन न करता मुद्दाम कामात चुका शोधतो. तिला रागवतो. काही दिवसांपूर्वी तिला दोन दिवस सुट्या हव्या होत्या. तिच्या आतेबहिणीचं लग्न होतं. तर बुवानं त्या मान्य केल्या खऱ्या, पण तिला असं काम सोपवलं की त्याची डेडलाईन अगदी त्या सुट्ट्यांना क्रॉस करणारी होती. शेवटी तिला लग्नाला जायचा निर्णय कॅन्सल करावा लागला,'' आशय अगदी भराभरा सांगत होता.
 
मिथिलाला नचिकेतनं आधीच सगळं सांगितलं होतं. पण ऋतूजाला अतिरिक्त काम दिल्यानं किंवा बॉस त्रास देत असल्यानं आशयला काळजी वाटणं, हे तिला फार सुखावून गेलं. नचिकेतलाही माझी अशीच काळजी वाटेत असेल, तोही माझ्याबद्दल असाच विचार करीत असेल, असा विचार मनात डोकावून गेला. ती मनोमन शहारली. सुखावली. आशयचं बोलणं सुरूच होतं.
(क्रमशः)

हे लग्न झालेल्यांनी, न झालेल्यांनी आणि लग्न होणार असलेल्यांनी ......नक्कीच वाचा: विचार करा.

हे लग्न झालेल्यांनी, न झालेल्यांनी
आणि लग्न होणार असलेल्यांनी ......
नक्कीच वाचा: विचार करा.

एका रात्री मी घरी आलो ते मनाशी काही ठरवूनच.
जेवताना मी तिचा हात हातात
घेतला आणि म्हणालो, "मला तुझ्याशी काही बोलायचं आहे."
तिच्या डोळ्यांत वेदना उमटली;
तरीही ती शांतपणे जेवत होती,
सगळे शब्द जुळवून मी तीला  सांगितलं,
मला घटस्पोट हवाय."
तिने शांतपणे विचारल,- "का?"
तिचा प्रश्न मी टाळला, ती भडकली.
समोरच ताट तिने भिरकावून दिलं.
लग्न मोडायला नेमकं काय कारण आहे,
हे तिल जाणून घ्यायचं  होत;
पण माझं मन दुसऱ्या  स्त्रीवर आलय हे मि तिला
स्पष्टपणे सांगू  शकत नव्ह्तो.

माझा बँक ब्यालन्स, कार, घर, सगळ मी तिला देऊ केलं:
पण मी समोर केलेल्या घटस्पोटाच्या कागदाचे तिने तुकडे केले.

दुसऱ्या दिवसी तिने माझ्यासमोर घटस्पोटा विषयीच्या अटीचा कागद समोर केला.
तिला माझ्याकडून काहीही नको होते, फक्त एक महिन्याची नोटीस हवी होती आणि
या एक महिन्यात दोघांनीही नॉर्मल रहावं अशी तिची इश्च्या होती.
तिची कारणे साधी होती. महिन्या भरात आमच्या मुलाची परीक्षा होती
आणि त्याच्यावर काहीही परिणाम व्हायला नको होता.
तिची आणखी एक अट होती.
लग्नाच्या दिवसी मी तिला बेडरूम पर्यंत कसं उचलून नेलं होत.
त्याप्रमाणे रोज महिनाभर तिला न्यायचं होत तशी तिची अटच होती.
मला वाटलं तिला वेड लागलंय; पण महिना व्यवस्थित जावा यासाठी मी तिची अट मान्य केली.
घटस्पोटाच्या विचारामुळे अनेक दिवस माझा पत्नीसोबतचा संपर्कच झालेला नव्हता. त्यामुळे पहिल्या दिवसी बेडरूम पर्यंत तिला नेताना आम्ही दोघही फार अवघडून गेलो.
मी तिचा हात धरून बेडरूम पर्यंत नेतान माझ्या मुलाने
बघितलं आणि त्याला फार आनंद झाला.
दुसया दिवसी ती माझ्या छातीला टेकून होती.
आपण आपल्या बायकोकडे बरेच दिवस
नित बघितलेच नाही हे मला जाणवलं;
आणि तिचा सहवास मला अचानक हवाहवासा वाटू लागला. आपण हिच्या बाबतीत असा अचानक निर्णय का घेतोय,
असा प्रश्न पडला.
त्यानंतरच्या प्रत्येक दिवसी तिला उचलून किंवा सोबन बेडरूम पर्यंत नेताना आमच्यातली एक हवीहवीशी जवळीक वाढत असल्याचं मला जाणवलं.
रोजच्या प्रमाणे तिला अचानक उचलताना मला जाणवलं, तीच वजन कमी झालंय. हृदयातल्या वेदनाचां
हा परिणाम होता. मी आस्थेने तिच्या कपाळाला स्पर्श केला.
दिवसागणिक तिचं कमी होणारं वजन 
माझी काळजी वाढवत होत.  पण तिच्या अटीच
पालन करताना मला आंतरिक समाधान मिळत होत, आमच्यात काय घडतंय  याची कल्पना
नसतानाही आमचा मुलगा खूप खुश होता.
आमच्यात दुरावा निर्माण झाला होता कारण आमच्यातली जवलीकच संपली होती.
जी परत आयुष्यात येत होती.
महिन्याच्या शेवटच्या दिवसी - मी मनाशी निर्णय घेतला.  माझ्या प्रेयसीच्या घरी आलो आणि मी माझ्या पत्नीला घटस्पोट देऊ शकत नसल्याच स्पष्टपणे सांगितले.
ती चिडली, संतापली, पण आता मला काही यैकायाच
नव्हते.  माझ्या प्रिय पत्नीचा हात मला आता मरे पर्यंत सोडायचा नव्हता.
मी वेगाने CAR चालवत घरी आलो. 
माझ्या चेहऱ्यावर हसू होत.
हातात फुलांचा गुच्छ होता. मी बेडरूम मध्ये पोहचलो, तर... माझी प्रिय पत्नी बेडवर निष्प्राण पडलेले होती.
मुलाला जवळ घेऊन मी अनावर रडत सुटलो.
माझ्या प्रेमापायी तिने जीव दिला होता. ती असताना मी जे करायला हव ते केल नाही.
जे प्रेम , जी जवळीक तिला हवी होती ती मी तिला दिली नाही. आता माझे अश्रू तिला परत आणू शकत नव्हते.
पती-पत्नीच्या नात्यात कार, बंगला, प्रेयसी, पैसा काहीही महत्वाच नाही.
महत्वाच आहे ते प्रेम, जवळीक आणि विश्वास.

वाचा आणि विचार करा. स्वताला विचारा --- "
आपल वैवाहिक आयुष्य खरच सुखाचं आहे?"

या कहाणीचा एकच संदेश आहे.---

" जे आहे-- जे प्रेमात आहे,
जे प्रेमाचे आहेत ते प्राणपणाने सांभाळा.
नाही तर पश्याताप...
 

Wednesday, December 1, 2010

अजीबो गरीब प्राणी "GirlFriend"

अजीबो गरीब प्राणी "GirlFriend"

आज हम एक अजीबो गरीब प्राणी के बारे में पढायेंगे .

इस जंतु का नाम है "GirlFriend" .

ये अक्सर "Boyfriend" के साथ पाई जाती है !

इनका पोस्टिक आहार "Boyfriend" का भेजा होता है !

इनको अक्सर नाराज होने का नाटक करते हुए देखा जा सकता है ! पर अगर पैसे खर्च किये जाये तो फीर नाटक ख़त्म हो जाता है...

इस प्राणी का सबसे खतरनाक हथियार रोना और इमोशनली ब्लैक मेल करना होता है !

गर्ल फ्रेंड से ब्रेक अप पर टेंशन नाम की बीमारी हो जाती है, जिसका कोई इलाज नहीं.. ये ही एक ऐसा प्राणी है जिसपे कोई विस्वास नहीं करता है...

गर्ल फ्रेंड के लिए बॉय फ्रेंड कुछ भी कर सकता है, यहाँ तक की हस्ते हस्ते कुत्ता भी बनता है... इस प्राणी में बहुत सारे अवगुण फीर भी ये प्राणी इतनी आसानी से नहीं मिलता है, ये प्राणी भाव बहुत खाता है, पर इस प्राणी के पास होता कुछ भी नहीं है जो वास्तविक हो जिसपे भाव खाया जा सके...ये प्राणी नर प्राणी को बर्बाद करने में कोई भी कसर नहीं छोरता है.

Thursday, November 25, 2010

आयुष्याच्या अल्बममध्ये

आयुष्याच्या अल्बममध्ये

आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात
गजर तर रोजचाच
आळसाने झोपले पाहिजे,
गोडसर चहाचा घोट घेत
Tom n Jerry पाहिल पाहिजे.
आन्घोळ फ़क्त 10 मिनीटे?
एखाद्या दिवशी 1 तास द्या,
आरश्यासमोर स्वतःला
सुन्दर म्हणता आल पाहिजे.
भसाडा का असेना
आपाल्याच सुरात रमल पाहिजे,
वेडेवाकडे अन्ग हलवत
नाचणसुध्धा जमल पाहिजे.

गीतेच रस्ता योग्यच आहे
पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,
रामायण मालिका नैतिक थोर
BayWatch सुध्धा enjoy करता आली पाहिजे.

कधीतरी एकटे
उगाचच फ़िरले पाहिजे,
तलावाच्या काठावर
उताणे पडले पाहिजे.

सन्ध्याकाळी मन्दिराबरोबरच
बागेत फ़िरल पाहिजे
'फ़ुलपाखरान्च्या' सौन्दर्याला
कधीतरी भुलल पाहिजे.

द्यायला कोनी नसल
म्हणुन काय झाल?
एक गजरा विकत घ्या
ओन्जळभरुन फ़ुलान्चा नुसता श्वास घ्या.

रात्री झोपताना मात्र
दोन मिनीटे देवाला द्या,
एवढ्या सुन्दर जगण्यासाठी

Wednesday, November 24, 2010

एक आठवण चाळून घे.............

एक आठवण चाळून घे.............

एक आठवण चाळून घे
नाव बुडण्याआधी किनारा पाहून घे
जो नेईल नदीपार असा सहारा शोधुन घे
माझा मृत्यू इथेच लिहीलाय याच सागरात
मला शेवटाचा एकदा मिठीत सामावुन घे.

जेवढं रडायचं आहे आज रडून घे
ज्या शपता सोडायच्या त्या सोडून घे
आठवणीशीवाय काहीच नाही माझ्याकडे
आणखी काही हवं असेल तर मागुन घे
आज तुझी प्रत्येक इच्छा पुर्ण करुन घे
आज शेवटच माला डोळे भरुन पाहून घे
उद्या तुझ्यावर कोणा दुस-याचा हक्क असेल
जे काही विसरायच असेल ते विसरुन घे
नाहीच जुळले तर शब्द जुळूवुन घे
सगळ्या कविता आज पुन्हां वाचुन घे
तुझ्या आठवणी जखमांवर मीठ चोळतात
जाताना तुझी एक एक आठवण चाळून घे.

Tuesday, November 23, 2010

मराठी व्यंगचित्र

मराठी व्यंगचित्र...........



म्हणुन मी हल्ली बोलतच नाही…..

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही…..

मित्रांची नावे ई-मेल आय.डी. असतात,
भेटायच्या जागा चाट-रूम असतात,
कट्ट्यावर कोणी आता भेटतच नाही,
दिलखुलास शिवी कानी पडतच नाही,

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

दिसले कि हाय, जाताना बाय
पण समोर असताना प्रश्नचिन्ह, कि बोलायच काय,
अशी खोटी जवळीक मी कधी साधतच नाही,
मुखवट्याआड चेहरा कधी लपवत नाही

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

आज इथे उद्या तिथे……… कोणासाठी कोणी थांबणार नाही
कोणीतरी साथ द्यावी हा माझा अट्टहास पण नाही,
पण इथुन तिथे जाताना कोणी निरोप तरी देइल कि नाही,
जाताना आपण, कोणी एक अश्रु तरी ढाळेल कि नाही,

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

शब्दच हल्ली अर्थ विसरतात,
संवेदनाच हल्ली बधीर होतात,
भावनाच हल्ली बोथट होतात,
अगदी थोडी माणसचं हि कविता शेवटपर्यत वाचतात,

म्हणुन………………..म्हण

ुन मी हल्ली बोलतच नाही

Apna Sapna Money Money

 Apna Sapna Money Money...........

WHAT IS A VIRUS?

WHAT IS A VIRUS?
1) Virus is a little program whos activity can destruct/destroy
some files and a computer system. If this program does not open, it's
inactive and could not or will not destroy anything.
WHAT IS A VIRUS-EMAIL?

2) The virus program is brought to you by an email as attachment. It
has a server itself (virus server). File virus attachments cannot go to
another email, such as an email was sent by user (netter), member,
moderator etc to be as their attachment. It must be brought to you by
email
itself,that we called EMAIL Of VIRUS.

WHAT'S THEIR ADDRES?

3) EMAIL OF VIRUS would be sent by any email address of any account,
that it found and cracked from some mailbox or address-book of other
person
anywhere. So that why the email of virus looks like it was sent by our
friend, our member,our moderator etc..... even it is able to email a
virus by our own email address.
HOW TO SEE IS THAT A VIRUS ATTACHMENT?

4) To identification of virus attachment:
a). it has a small size ( <150KB )
b). it has extension file name such as below:
*.scr
*.clp
*.pif
*.bat
*.exe
*.com
*.txt
*.doc
*.lhz
*.rhz
and some time it's compressed by *.zip file.
Also by the fake name HotMovie.MPEG__________scr.
Actualy the file is virus file with extension .scr

HOW TO SEE IS THAT AN EMAIL VIRUS?

5) You are would able to understand an email virus from their SUBJECT,
most of them contains an amazing statement or unsusal word, such as
below:
Weah ^_^ :))
Hokki=)
Hi :)
ello!=))
Hello -:))
Hey, dude, it's me ^_^
access Mpeg
Re:your text
Re:Text message
Re:Msg reply
Re:Is that your document?
Re:Hot Movie(MPEG)
Re:Information...
Re;Important info
Re:This is your photos!:)
and more, and more...
If you received emails with the subject matter as above, you
should delete even with out openin.

NOTE:

Don't have words in ur email subject which resembles a virus mail
Otherwise your email would be deleted by recipient[s].

BEAWARE it's dangerous.

*** If one of your file is infected by virus, it will change into
function of a virus and might infecte all files in your hard disk.


तो आणि ती (भाग बारा)


प्रेमातला समजूतदारपणा (तो आणि ती)

मिथिला आणि नचिकेतचा कॉलेज ग्रुप एकाच कंपनीत नोकरीला होता. पण प्रशिक्षणादरम्यान त्यांच्या ग्रुपला दोन भागात विभागण्यात आलं होतं. त्यात मिथिला सोबत आशय, तर इतर सहकारी नचिकेतच्या ग्रुपमध्ये होते. नचिकेतनं मिथिलाच्या ग्रुपमध्ये सामील होण्याचा प्रयत्न केला. पण त्याला यश आलं नाही. मिथिला आणि आशयचं घरही पुण्यात एकाच परिसरात होतं. त्यामुळे दोघं सोबत ऑफिसला जात असत. यावरून मिथिला आणि नचिकेतच्या संबंधात थोडी ओढाताण झाली. बघूया पुढे काय झालं ते...---
नचिकेत बोलत होता. आणि मिथिला कान देऊन शांत चित्तानं ऐकत होती. मिथिलाला मध्येच बोलता आलं असतं. नचिकेतला टोकता आलं असतं. पण सध्या तिला फक्त ऐकायचंच होतं. त्याशिवाय नचिकेतच्या मनातील मरगळ शब्दांच्या रूपात बाहेर आली नसती. पोट खराब झालं की ते जसं रिकामं करावं लागतं. तसंच नचिकेतच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी आधी त्याचं मन रितं करणं गरजेचं होतं. शेवटी नचिकेत थांबला. त्यानं आपल्या शब्दांना आवर घातला. तसं त्याला समजवण्यासाठी मिथिला पुढे सरसावली. ती याच क्षणाची अगदी शांतपणे वाट बघत होती. नचिकेत बोलत असताना त्याच्या बोचऱ्या शब्दांनी दुःखी न होता आपली बाजू अधिक स्पष्टपणे आणि समजेल अशा शब्दात मांडण्यासाठी तिनं मनातल्या मनात तयारी केली होती. आपल्या बाबी तपासून पाहिल्या होत्या. कारण नचिकेतचा गैरसमज मनावर घेऊन तिला आपल्या जिवाचा तिळपापड करायचा नव्हता. तर त्यांच्या संबंधात आलेली मरगळ दूर करायची होती. तेही नचिकेतच्या मनाला ठेच न पोचवता. उद्देश अगदी स्पष्ट होता. कारण कधीकधी बोलण्याच्या नादात तोंडातून पडलेले शब्द आपल्याला अभिप्रेत नसतात. त्यानं विषयाची दिशाच बदलून जाते. आणि मूळ गोष्ट बाजूला राहून लहान-सहान गोष्टींना महत्त्व प्राप्त होतं. गैरसमजुतीचं वादळ शमण्याऐवजी आणखी बलवत्तर होतं. शिवाय नचिकेतच्या समजूतदारपणावर तिचा पूर्ण विश्‍वास होता. फक्त आपली गोष्ट त्याला पटवून देणं ही प्राथमिकता होती. मिथिला बोलती झाली.

""नचिकेत तू समजूतदार आहेस. मला कायम समजून घेतोस. याचा मला अभिमान आहे. तू जराही ब्लॉक माईंडेड नाहीस. तर तू व्यक्तिस्वातंत्र्यावर विश्‍वास ठेवणारा एकविसाव्या शतकातील मॉडरेट मुलगा आहेस. पण गोष्ट जेव्हा माझ्याबाबत असते, तेव्हा तुझा दृष्टिकोन थोडा बदलतो. आधी आपण मित्र असताना इतर मुलांसोबत माझं बोलणं, त्यांच्याशी असलेली मैत्री याबाबत तू कॉन्झरव्हेटिव्ह नव्हतास. पण दोघांमध्ये एक प्रेमाचं नातं तयार झाल्यावर तुझ्या विचारांमध्ये किंचित बदल झाला. हा बदल तू दूर करायला हवास असं मला वाटतं,'' मिथिलानं मूळ मुद्‌द्‌याला हात घातला. ती अगदी समजेल अशा शब्दात आपली बाजू मांडत होती.

""हे बघ नचिकेत आपण सध्या मनानं कितीही एकरूप असलो, तरी जगाच्या दृष्टीनं बघितलं तर अजून आपलं नातं तयार व्हायचंय. आजवर हे नातं आपण अगदी हळुवारपणे जपत आलोय. सध्या नात्याची प्राथमिक अवस्था आहे. जसे जसे दिवस जातील, तशी तशी नात्याला बळकटी मिळेल. आपण एकमेकांना अधिक चांगल्या पद्धतीनं समजून घेऊ शकू. पण यासोबतच आपल्यात गैरसमजुतीचे अडथळे निर्माण होणार नाहीत. आपलं मन दूषित होणार नाही. याची आपण काळजी घेतली पाहिजे. नाहीतर आपण नात्याच्या रूपानं पुढे जात असताना मनातली विषण्णता कायम राहील. उद्या आपण आपलं नातं जगाच्या पटलावर ठेवून त्याला समाजाची मान्यता मिळवू. पण मनातली अस्वस्थता कायम राहील. ती आपल्याला मनातल्या मनात टोचत असेल. बोचत असेल. तेव्हा आतापासून आपण स्वतःला प्रिपेअर करायला हवं. मनातल्या शंका-कुशंका दूर करण्यासाठी एकमेकांची मदत घ्यायला हवी. अन्यथा पुढेही नात्यात अडथळे निर्माण होत राहतील. आणि आपला मुक्त संवाद तुटेल,'' मिथिला आज काही थांबणार नव्हती. तिला आपली बाजू पूर्णपणे मांडायची होती.

""नचिकेत मी शिकले. नोकरीला लागले. माझ्या नोकरी करण्यावर तुझा आक्षेप नाही. कारण शिकलेल्या मुलींनी घरी बसून न राहता नोकरी करावी, आपलं करिअर घडवावं, अशा मॉडरेट विचारसरणीचा तू आहेस. पण नोकरी म्हणजे आठवड्यातून पाच-सहा दिवस मान मोडून काम आणि त्यानंतर पगार, असा अर्थ होत नाही. नोकरी करीत असताना माझा इतर पुरुषांशी संबंध येणार. त्यांच्याशी मला व्यवहार ठेवावा लागणार. आमची कदाचित मैत्रीही होऊ शकते. कारण जशा तुला मैत्रिणी आहेत, तसेच मला मित्र राहू शकतात. आणि आहेही... कदाचित माझी नाईटशिफ्ट असली, तर मी रात्री उशिरा घरी येणार. तेव्हा मला समजून घेणारा, माझ्या भावनांना जाणून घेणारा एक व्यक्ती घरी असल्याची भावना तुला व्हावं लागेल. अन्यथा ऑफिसमध्ये तेथील ताणतणाव आणि घरी आल्यावर त्यात आणखी भर मला नकोय. आपल्या बायकोला ऑफिसला जाऊ देणारा नवरा मला नकोय. तर त्यासोबत ऑफिसशी संलग्न बाबी समजून घेणारा नवरा मला हवाय. कारण ऑफिसला जाऊ देणं हा बेगडी समजूतदारपणा झाला. आणि ऑफिसशी संबंधित बाबी समजून घेणं, त्याप्रमाणे वागणं हा खरा समजूतदारपणा आहे. मला वाटतं तुला माझं बोलणं पटलं असेल,'' मिथिलाच्या जिभेचा पट्टा थांबला.
नचिकेत आपली बाजू मांडण्याची आतुरतेनं वाट बघत होता. तो बोलायला लागला.

""मिथिला मी ब्लॉक माईंडेड मुलगा नाही, हे आत्ताच तू मान्य केलंस. कारण माझा तसा स्वभाव नाही, याची तुला पुरेपूर कल्पना आहे. पण मनात गैरसमजुती तयार होऊ नयेत, यासाठी आपल्या वागण्या-बोलण्यात स्पष्टता ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. त्यात थोडी ऍम्बीग्वीटी आली की संबंध ताणली जातात. तू नाईटशिफ्टचा उल्लेख केलास म्हणून तुला सांगतो. नाईटशिफ्ट करायला माझा जराही विरोध नाही. पण किमान तू मला सांगायला तर हवंस की आज नाईटशिफ्ट आहे. रात्री दहा वाजून गेले तरी तू घरी नाही आलीस, तर मी नवरा म्हणून आणि तू बायको म्हणून एकमेकांची चौकशी करणारच ना. कारण तो गैरसमजुतीचा भाग नाही, तर संवादातील विसंवाद आहे. तसंच तू मला न सांगता नाईटशिफ्टला गेलीस आणि परत येताना जर एखाद्या कलीगच्या गाडीवर आलीस, तर मी तुला त्याचं स्पष्टीकरण मागण्याआधी तू ते द्यायला हवंस. कारण ती तुझी जबाबदारी आहे,'' नचिकेत काही हार मानायला तयार नव्हता.

""पण नचिकेत तू मगाशी म्हणालास की तुमच्या दोघांमध्ये मी व्यत्यय आणतो. ही काय बोलायची भाषा झाली. अरे आपल्या व्यक्तीशी बोलताना शब्दांचं तारतम्य बाळगायचं असतं की नाही. मला तुझं बोलणं जराही आवडलं नाही... पण मी तुला दिवसभर फोन केला नाही. हे माझं चुकलं. त्याबद्दल सॉरी. एक्‍स्ट्रीमली सॉरी. मी चित्रं काढण्यात कितीही गुंग झाली असली, तरी तू माझ्या फोनची वाट बघत आहेस, हे मी लक्षात ठेवायला हवं होतं,'' मिथिलानं थोडी नरमाई दाखवून नातं पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. कारण तिला नचिकेतचा स्वभाव ठाऊक होता. केवळ संवादातील विसंवादामुळे दोघांमध्ये गैरसमज निर्माण झाल्याचा जाणकारपणा तिच्यात होता. पण नचिकेतनं अजून सॉरी म्हटलं नव्हतं...!
(क्रमशः)

प्रेमातला समजूतदारपणा (तो आणि ती)

Monday, November 22, 2010

मराठी मुलगी

मराठी मुलगी

class मधे अनेक mod मुली असतात,
पण जी गोड लाजते,
ती मुलगी मराठी असते.

class मध्ये मुली short top घालतात.
पण जी पाठ दिसू नये म्हणून top खाली ओढते,
ती मुलगी मराठी असते.

class मध्ये मुली jeans घलुन येतात,
पण जि jeans बरोबर पायात पैजण घालते,
ती मुलगी मराठी असते.

class मध्ये अनेक मुली असतात
पण वात्रटपणा केल्यावए कानाखाली वाजवते
ती मुलगी मराठी असते

class अनेक मुली असतात
स्वतःच्या नोट्स सहज दुसरयाला देते
ती मुलगी मराठी असते

शॉपींगलाही अनेक मुली जातात
खर्चाचा विचार करुन फ़क्त कानातलं घेऊन येते
ती मुलगी मराठी असते

Saturday, November 20, 2010

टेलिमाकेर्टिंग कॉल कसे थांबवाल ?

टेलिमाकेर्टिंग कॉल कसे थांबवाल ?

' सर , अमक्या बँकेतून बोलतोय... लोन हवंय का ?' असं विचारणाऱ्या किंवा प्रॉडक्ट्स खपवू इच्छिणाऱ्या टेलिमाकेर्टर्सच्या फोन कॉल्सनी त्रस्त झालायत ? मग थोडं डेअरिंग करून आम्ही सांगतो ते उपाय करून पाहा... हे कॉल्स एंजॉय करू लागाल , ही गॅरंटी




१. फोनवरून त्याने/तिने बोलणं संपवताक्षणी म्हणायचं , '' तुझा आवाज मला खूप आवडला. मी प्रेमातच पडलो/लेय तुझ्या. लग्न करशील माझ्याशी ?''




२. टेलिमाकेर्टिंगवाल्याला सांगा , '' मी आत्ता जरा




बिझी आहे. तुमचा घरचा नंबर द्याल का प्लीज! मी मोकळा झाल्यावर करतो तुम्हाला फोन. ''



३. एकदा माहिती दिली की पुन्हा विचारा , '' हं , काय सांगत होतात तुम्ही ?'' असं तीन चार वेळा करा.





४. तुम्ही जेवत असताना असा फोन आला की सांगा , '' मी जेवतोय. दोन मिनिटं जरा होल्ड करा हां. '' मग स्पीकर फोन ऑन करून फोन बाजूला ठेवा आणि आरामात जेवत राहा. खाण्याचे मचमच आवाज करा आणि इतरांशी गप्पाही मारत राहा.














टेलिमाकेर्टिंग कॉल कसे एन्जॉय कराल...









१. फोनवरच्या माणसाला सांगा, ''माझे सर्व व्यवहार माझा मुलगा पाहतो, त्याच्याशी बोला.' आणि फोन आपल्या पाच वर्षांच्या मुलाच्या हातात द्या (किंवा स्वत:च पाच वर्षांच्या मुलाच्या आवाजात बोलू लागा.)






२. ''हॅलो, हां कोण बोलतंय? हॅलो, कोण बोलतंय? जरा मोठ्यानं बोला... आणखी मोठ्यानं बोला हो जरा... अजिबात ऐकायला येत नाहीये तुमचं... फोन आहे का चुन्याची डबी? हॅलो... आणखी मोठ्याने बोला...'' ही वैश्विक युक्ती टेलिमाकेर्टिंगवाल्यांवरही लागू पडतेच.







३. त्यांना







सांगा, ''एक मिनिट. एकेक शब्द बोला.

मी तुमचं सगळं बोलणं लिहून घेतोय. माझ्या काहीही लक्षात राहात नाही. एकेक शब्द आणि अगदी हळूहळू... घाई नको... हां कुठून फोन केलाय तुम्ही... आय... सी... आय... हळू हळू सांगा...''







४. त्यांनी विचारलं, ''हाऊ आर यू सर?'' की लगेच सुरुवात करा, ''मला हे तुमचं फार आवडलं. तुम्ही फक्त व्यापार करत नाही. माणुसकी जपता. आजकाल कोण कुणाला विचारतं हो की कसे आहात? माझे तर तुम्हाला सांगतो इतके प्रॉब्लेम सुरू आहेत...''

आम्ही अशा देशात राहतो


आम्ही अशा देशात राहतो

जिथं पोलिस आणि रुग्णवाहिकेपेक्षाही लवकर तुमच्या घरी "पिझ्झा" पोह्चतो,

जिथं वाहन कर्ज ५% तर शैक्षणिक कर्ज १२% नी मिळतं,

जिथं तांदुळ ४० रु. किलो तर "सिमकार्ड" मोफत मिळतं,

जिथं एक लखपती लाखो रुपये देवुन क्रिकेटचा संघ विकत घेतो, मात्र तीच रक्कम दान नाही करत,

जिथं पायात घालायच्या चपला/ बुटं वातानुकुलित दुकानात विकली जातात तर पोटात घालायच्या पालेभाज्या उघड्या रस्त्यावर विकल्या जातात,

जिथं प्रत्येकाला प्रसिध्दी हवी आहे, मात्र त्यासाठी कुणी सत्-मार्ग अवलंबण्यास तयार नाही,

जिथं लिंबाच्या पेयात कृत्रिम स्वाद मिळवला जातो, मात्र भांडी धुण्याचा साबणात अस्सल लिंबु असतं,

जिथं चहाच्या टपरीवर लोक "बालमजुरी" वरच्या वर्तमान पत्रातील बातम्यांवर चर्चा करतात - म्हणतात "यार, बाल-मजुरी करवणार्‍यांना फासावर लटकवलं पाहिजे" .... आणि नंतर आवाज देतात...."छोटु.... दोन चहा घेऊन ये...!"



..... तरीसुध्दा ...... माझे माझ्या देशावर प्रेम आहे!

Friday, November 19, 2010

महान विचार

महान विचार

१. ज्यांनी रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चाताप होतो, त्यांनी सरळ दुपारी उठावे.

२. माणसाने नेहमी स्पष्ट बोलावे, म्हणजे ऐकणार्‍याला स्पष्ट ऐकू जाते.

३. मूलभूत राजकीय पक्ष दोनच: सत्ताधारी, सत्ताकांक्षी

४. दोन जोडपी समोरासमोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या, दागिने बघतात, तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात.

५. मुलगा व नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे.

९. काळ हा सर्वोत्तम शिक्षक आहे, पण तो आपल्या सगळ्या शिष्यांचा बळी घेतो.


अर्धा मालक ( पुणेरी रिक्षावाला )

अर्धा मालक ( पुणेरी रिक्षावाला )

पुण्यातल्या रिक्षावाल्यांनी आता युनिफॉर्म घातलाच पाहिजे, असा धमकीवजा आदेश सरकारकडून प्राप्त झाल्यावर काहींनी स्वखुशीने; तर काहींनी नाराजीने युनिफॉर्मची व्यवस्था केली. युनिफॉर्म घातला नसेल तर त्याला अडवून त्याच्याकडून दंडाची वसुली करण्याचेही कलम त्या अध्यादेशात होते. त्याचप्रमाणे आपले नित्याचे काम सांभाळून पोलिस लागले याही कामाला. रीतसर पावती फाडणे, कोणाचीही अडवणूक नाही, इतके जरी असले तरी आडबाजूने एक अर्धवट युनिफॉर्म असणारा रिक्षावाला पोलिसांची नजर चुकवून चाललाच होता.
चाणाक्ष पोलिसांनं शिट्टी वाजवून त्याला थांबवलं.
"हे काय?''
"कुठं काय? - रिक्षावाला
"युनिफॉर्म कुठं आहे?'' - पोलिस
"हा काय युनिफॉर्मच आहे' - रिक्षावाला
"असला युनिफॉर्म असतो का? एक तर पूर्ण खाकी किंवा पूर्ण पांढरा - माहीत आहे ना?''
"हो पण अडचण अशी आहे की...'' रिक्षावाला घाबरत म्हणाला.
हे ऐकून पोलिसाला जोर आला. तो दमदाटीच्या स्वरात रिक्षावाल्याला म्हणाला - ""मग मघाशी काय म्हणालास युनिफॉर्म आहे म्हणून.
"खाकी पॅंट आणि पांढरा मॅनिला हा असला अर्धवट युनिफॉर्म कसला?'' - पोलिस.
"कसला युनिफॉर्म हवाय माहितेय ना?'' पोलिस
"हो तर!! रिक्षाच्या मालकाचा पूर्ण पांढरा आणि नोकराचा पूर्ण खाकी - रिक्षावाल्याचे उत्तर.
मग? तुझा कसला आहे?
"अर्धा खाकी, अर्धा पांढरा'' - रिक्षावाला.
"मग फाड पावती'' - पोलिस.

"अहो साहेब, ही रिक्षा की नाही, मी माझ्या मालकाकडून विकत घेतो आहे. आता निम्मे पैसे फिटलेत म्हणून निम्मा मालक - म्हणून पांढरी पॅंट, आणि निम्मा नोकर म्हणून खाकी मॅनिला''- एवढं समर्पक उत्तर देऊन रिक्षावाला रिसीट न फाडताच पसार झाला.
उत्तरानं पोलिसांचं समाधान झालं का नाही माहिती नाही. पण कपाळावर हात मारून आजूबाजूच्या पब्लिकसहित तो पोटभर हसला मात्र !.....

पुणेरी नजरेने पुणेरी वाहतूक


पुणेरी नजरेने पुणेरी वाहतूक
पुण्यातली वाहतूक ही नेहमीच अखंड चर्चेचा विषय...! अभिजित वैद्य यांनी एक (काल्पनिक) मुलाखत घेतलीय...अस्सल पुणेरी वाहन चालकाची...


एका पुणेकराची "पुण्यातील वाहतूक" या विषयावर घेतलेली ही मुलाखत.


१) तुम्ही कोणते वाहन चालवता ?

पुणेकर - कोणते वाहन चालवतो हे फारसे महत्वाचे नाही. पुलंनी सांगितल्याप्रमाणे पुण्यात कोणतेही वाहन चालवणे म्हणजे हत्यार चालवण्यासारखेच आहे.

२) पुण्यातील वाहतुकीची समस्या एवढी गंभीर होत आहे. पुणे आता देशातील सर्वाधिक दुचाकींचे शहर म्हणून ओळखले जाते. त्याबद्दल तुम्हाला काय वाटते ?

पुणेकर - आम्हा पुणेकरांना प्रत्येक गोष्टीबाबत काहीतरी वेगळे वाटत असते असे तुम्हाला का वाटते ? काहीही वाटत नाही, सकाळ संध्याकाळ रस्त्यावर असताना

लोकांना, सरकारला शिव्या देत जायचे आणि घरी आल्यावर सगळे विसरायचे. बास !

३) वाहतुकीच्या समस्येबद्दल पुण्याबाहेरून आलेले लोक जबाबदार आहेत असे तुम्हाला वाटते का ?

पुणेकर - आम्ही आतले, बाहेरचे असा भेदभाव करत नाही. कोण गाडी चालवत आहे, यावर आपला टोमणा ठरतो. तरुण मुलगा असेल तर, "बापाच्या पैशावर

मजा मारतात साले", तरुणी/बाई असेल तर, "या बायकांना जन्मात गाडी चालवता येणार नाही.". म्हातारा(५५+) मनुष्य असेल तर, "या वयात झेपत

नसताना गाडी चालवायची कशाला ?" असा शेरा तयार असतो.
४) वाहतूक सुरळीत होण्यासाठी वाहतूक विभाग निरनिराळ्या योजना आखत असते. त्याचा काही फायदा होतो असे तुम्हाला वाटते का ?

पुणेकर - वाहतूक विभागाच्या तथाकथित योजना मी फक्त वर्तमानपत्रात वाचतो. मोठा गाजावाजा करून असल्या योजना सुरु करतात. खुद्द रस्त्यावर काही दिसत

नाही. चौकातील कॅमेरे चालू नसतात. रेल्वे स्थानकावर प्रीपेड रिक्षा नसतात. आपण काहीतरी योजना आखतोय असे दाखवणे हे त्यांचे काम आहे. ते करतात.

करू दे.

५) महानगरपालिका वाहतुकीसाठी काही करते का ?

पुणेकर - महानगरपालिका फक्त रस्ते खोदते आणि वाहतुकीची समस्या वाढवते. सांगितलेल्या वेळेत रस्ता कधीच कसा पूर्ण होत नाही ? महानगरपालिकेने

वाहतूकीबाबत केलेला सर्वात मोठा विनोद म्हणजे बी.आर.टी. असावा. या योजनेत त्यांना नक्की काय करायचे आहे, हे त्यांना तरी ठावूक आहे का ?

६) जर महानगरपालिका काही करत नाही, तर तुम्ही महानगरपालिकेतील सत्ता बदलत का नाही ?

पुणेकर - तुम्ही वाहतुकीबद्दल मुलाखत घेत आहात ना, मग वाहतुकीबद्दल बोला, उगाच राजकारणात घुसू नका.

७) वाहन चालवणाऱ्या इतर लोकांबद्दल आपल्याला काय वाटते ?
पुणेकर - ती माझ्यासारखीच माणसे आहेत. एखादा माणूस कोणते वाहन चालवतो यावर त्याच्याबद्दलचे मत ठरते. चारचाकीवाले पैशाचा माज असलेले असतात.

दुचाकीवाले उगीच भाव खाणारे आणि जमेल तेथे घुसणारे असतात. रिक्षावाले अडाणी, भांडखोर असतात. पादचाऱ्यांना कसे चालावे ते समाजात नाही.

पी.एम.टी. च्या वाहनचालकांद्दल तर बोलायलाच नको. वाहन चालवणाऱ्या सगळ्यांना रस्ता आपल्या बापाचाच आहे असे वाटत असते.

८) वाहतूक विभागातील पोलिसांबद्दल आपणास काय वाटते ?

पुणेकर - पोलिसांबद्दल कोण चांगले बोलतो का ? मला वाटते फक्त गृहमंत्रीच पोलिसांबद्दल चांगले बोलत असावेत. पोलीस म्हणजे पैसे खाणारे, एवढेच आम्हाला

कळते.

९) वाहतुकीच्या कायद्यांबद्दल जागृती नाही म्हणून असे घडत आहे का ?

पुणेकर - पुण्यातील वाहतुकीचे कायदे हे relative असतात. तुमच्या गाडीला कोणाची धडक बसली आहे कि तुम्ही कोणाला धडकला आहात, यावर कायदे

ठरतात. इथल्या वाहतुकीत सगळे relative असते. समोरच्याला पिवळा सिग्नल असतान आपण गाडी पुढे नेतो. "२ सेकंदच तर आधी निघतो आहे. त्यात

एवढे काय" असे आपल्याला वाटते. समोरचा माणूस पण असाच विचार करतो आणि २ सेकंद उशिरा निघतो. हे मात्र आपल्याला चालत नाही.

१०) या वाहतुकीमुळे काही फायदा होतो का ?

पुणेकर - आता घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी चांगले शोधायचे. सिग्नल पलीकडील झाडामागचा पोलीस शोधताना नजर तीक्ष्ण होते.पोलिसांनी पकडल्यावर

वाटाघाटींमध्ये आपण तरबेज होतो. पोलींसमोर रडवेला चेहरा करताना अभिनयकौशल्य सुधारते. भांडण करताना जरी आपलीच चूक असली तरी भांडून वाद विवादाची तयारी होते. एफ. एम. वाल्यांना वाहतुकीवर कार्यक्रम करता येतात. असे बरेच फायदे शोधता येतील.

११) तुम्ही पुणेकरांना काही संदेश द्याल का ?

पुणेकर - काहीही करा, फक्त माझ्या गाडीखाली येवू नका. बाकी पुणेकर सुज्ञ आहेतच

पुणेरी चपराक

पुणेरी चपराक
काही वेळेला " खोडी " काढायचं मनात नसतं . पण ग्राहकानं अनाठायी शंका विचारुन बेजार केलं तर " इरसाल पुणेरीउत्तराची " चपराक बसते .



उदा .

शिट्टीवर सुरेल गाणं सादर करणारा मित्रवर्य अप्पा कुलकर्णी मुळात महाराष्ट्र बँकेत होता . त्याच्या बँकेसमोरचा रस्ता फक्त ओलांडायचा अवकाश , समोरच आणखी एक सहकारी बँक होती . तिथलाच " चेक " घेऊन आपल्यामहाराष्ट्र बँकेतल्या खात्यात भरण्यासाठी ग्राहक महाशय आले . नेमकं काउंटरवरच्या अप्पाला त्यांनी विचारलं . " कॅश कधी होईल ?"


अप्पा म्हणाला , " उद्या बँकेला सुट्टी आहे , परवा होईल ."


ग्राहाकानं विचारलं , " का पण ? समोरच्या बँकेचा तर चेक आहे . वेळ लागतोच कसा ?"


" अहो . उद्या सुट्टी आहे ...".. अप्पाचा नम्रपणा अद्याप सुटला नव्हता !


" पण समोरच तर बँक आहे ...." ग्राहक हेका सोडेना .


मग खट्याळ अप्पाला राहवेना . तो म्हणाला , " काका , काय आहे , केवळ रस्ता ओलांडल्यावरच्या बँकेचा चेक आहे म्हणुन लगेचच कॅश होतो असं नसतं . प्रोसिजर असते ... असं बघा ."

" काही सांगु नका , प्रोसिजर - बिसिजर !"

" ऐका तर काका ... वैकुंठ, स्मशानभुमीच्या दारातच .. समजा तुम्ही गेलात म्हणजे मेलात तर दारातच गेले म्हणुन सरणावर चढवतील का ? आधी ससुनला नेतील ... चेक करतील .. घरी नेतील .. हार घालतील .. म्रुत्यु पास काढतील .. मग वैकुंठकडे ..!!"

" कळलं ..!" फणकारत ग्राहक महाशय निघुन गेले। अशा इरसाल प्रश्नोत्तरामुळे किंवा " न " विचारता केलेल्या - नोंदविलेल्या प्रक्रियेमुळेच पुण्याचा जिवंतपणा टिकुन आहे ... पूणं कधी ' डल ' होत नाही ..!

नवरा बायकोतील काव्यमय संभाषन

 नवरा बायकोतील काव्यमय संभाषन

एकदा त्याचे आणि तिचे भांडण झाले.तो तिच्यावर रागावून बसला.तिने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला.
पण तो काही ऐकेच ना! शेवटी रागाने ती ही म्हणाली.."मी आहे तर इतका रागावतो आहेस,मी नसेन तर काय करशील?"

मी नसेन तर
ती : तुझ्या आयुष्यात मी नसेन तर सांग कसा जगशील?
कोणाच्या डोळ्यात स्वत:ला बघशील?
कोणाच्या आसवांना टिपशील?
कोणाच्या निरर्थक गप्पांमध्ये रमशील?
कोणाच्या ओठावर हासू फ़ुलवशील?
कोणावरून मित्रांमध्ये मिरवशील?

बाईक ची मागची सीट जेव्हा रिकामी राहील,
समोरचा आरसा ही जेव्हा माझी वाट पाहील,
ट्राफ़िकचा गोंगाट ही जेव्हा शुल्लक वाटेल,
ती १० मिनिटेही एका तपासारखी भासतील,
सांग तेव्हा काय करशील?

कामात बुड्वून जरी घेशील स्वत:ला,
माझी आठवण येताच...
मोबाइलवर लक्श नकळत जाईल,
पण तो वाजणार नाही...
तुला काहीतरी चुकचुकल्यासारखे नक्की वाटॆल...
सांग तेव्हा काय करशील?

मी नसेन तर ...
तुला चित्रपट रटाळ वाटेल...
सुन्दर धुनही बेकार वाटेल...
पुस्तकही नाराज वाटेल....
मनातून नक्की तळमळशील..

दिवसभर दुस-यांच्या चाणाक्श नजरेपासून लपशील...
उगाच किना-यावर माझी वाट बघशील...
संधीकाळी हुरहुरशील...
माझ्या आठवाने बेचैन होशील..
पण अलगद आपले दु:ख पिऊन टाकशील...
मावळत्या सूर्याला आपल्या अश्रूंचे अर्घ्य देऊन...


गर्दीतही एकटा राहशील,
पुन्हा पुन्हा मागे पाहशील,
मी नजरेस पडणार नाही...
हताश होऊन जड पावलांनी पुढे चालशील..
तू ही त्याच गर्दीत हरवून जाशील.....कुठेतरी...

तू लाख स्वत:ला रमवशील,
दुस-यांमध्ये स्वत:ला हरवशील,
नवीन ना्त्यांना जोडशील....पण
खरच सांग .........
"काय मला विसरू शकशील???"


************ ********* *********

तिचे बोलणे ऐकून तो जरा... अस्वस्थ झाला. त्याच्या चेहे-यावरचा तो भाव तिला काही निराळाच भासला. क्शणातच त्याचा राग गायब झाला होता. त्याच्या डोळ्यातच तिला तिच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले... हसून त्याने तिला विचारले.....आता तुझी पाळी....

तो : तुझ्या आयुष्यात मी नसेन तर....
आता तू सांग कशी जगशील??
हाताच्या रेषांमध्ये कोणाचे नाव शोधशील?
आरशात पाहून कोणाच्या विचाराने लाजशील?
खिडकीत लपून कोणाच्या येण्याची वाट बघशील?
कोणाला आपल्या गप्पांमध्ये गुंतवशील?

एकाकीपण जेव्हा खायला येईल,
निरभ्र आभाळ जेव्हा अचानक भरून येईल,
गड्गडाटाने जेव्हा सौदमिनी गरजेल....
तेव्हा सांग कोणाला बिलगशील??

गप्पांचा ओघ ओसरू लागताच..
तू नकळत काही बोलून जाताच...
सांग स्वत:ला कशी आवरशील?
जखमी मनाला कशी सावरशील?

चांदण्या रात्री अर्धचंद्र पाहताना
कोणाच्या आठवात गढशील?
सुखाच्या आठवानेही तू
टपोरे अश्रू पाघळशील...
एकटीच स्फ़ुंदत बसशील..
किती वेळ तरी....

मैत्रिणींना एका "मैत्रिणीची" गोष्ट सांगताना.......
तू हळवी होशील...रडशील.
आठवशील फक्त मला...
बाकी सारे विसरशील.

माझी जाणीव हवा तुला करून देईल,
माझा भास छाया तुला करून देईल,
पाहशील जेव्हा झोपाळा एकाकी झुलताना,
माझा आभास श्वास तुला करून देईल,

लक्श कुठेही लागणार नाही,
चंचल चित्त स्थिरावणार नाही
स्वत:चे अश्रू कसोशीने तू दडशील,
मनात मला लपवून "नोर्मल" जगशील,
तुझ्या मनाचा रिक्तपणा कोणालाही कळणार नाही,
तू असेच दिवस रेटत जाशील...
सांग काय करशील?

तिच्या गोंधळलेल्या चेहे-यावर कोरलेले उत्तर त्याला उमजले..........
आणि त्यांचे ते भांड्ण...... असेच विरून गेले!!!

मुलींना ओळखणं कठीण असतं………...

मुलींना ओळखणं कठीण असतं………...

मुलींना ओळखणं खरंच कठीण असतं का हो? त्यांच्या मनात काय चालू असतं हे एक देवच काय ते जाणे अन् ती मुलगी...
तुम्ही तिची तारीफ केली, तर तिला वाटतं तुम्ही खोटं बोलता आहात
तारीफ केली नाही, तर तुम्हाला मुलींशी कसं वागायचं तेच कळत नाही.
तिच्या सगळ्या म्हणण्याला होकार दिला, तर तुम्हाला स्वत:चे विचारच नाहीत
होकार नाही दिला, तर तुम्ही तिला समजूनच घेत नाही.
तुम्ही तिला वारंवार भेटलात, तर ते किती बोअर असतं
तिला वारंवार भेटला नाहीत, तर तुम्ही तिला डबलक्रॉस करताय?
तुम्ही वेलड्रेस आहात, तर तुम्ही नक्कीच प्लेबॉय आहात
तुम्ही नीट कपडे केले नाहीत, तर तुम्ही किती गबाळे आहात हो?
तुम्ही जेलस होता, किती वाईट आहे हे!
तुम्ही तिच्यासाठी जेलस होत नाही? तुमचं तिच्यावर प्रेमच नाही
तुम्ही तिला किस करता, तर तुम्ही जण्टलमनच नाही
तुम्ही किस करत नाही, तर तुम्ही मॅनच नाही
तुम्ही तिला वारंवार किस केलं, नाही तर तुम्ही किती थंड आहात
तुम्ही तिला वारंवार किस केलं, तर तुम्ही तिचा गैरफायदा घेत असता.
तुम्ही तिच्याशी प्रेमात येताय? तुम्हाला तिचा आदरच वाटत नाही
नाहीतर तुम्हाला ती आवडतच नाही.
तुम्हाला यायला एक मिनिट उशीर झाला, तर वाट पाहणं किती कठीण असतं?
तिला यायला उशीर झाला, तर मुलींना होतो असा उशीर!!!
तुम्ही कोणाला भेटायला गेलात, तर तुम्ही वेळ फुकट घालवता
ती कोणाला भेटली, तर ते कामासाठी असतं...
रस्ता ओलांडताना तिचा हात धरला नाही, तर तुमच्याकडे एथिक्सच नाहीत
तुम्ही हात धरला, तर तिला स्पर्श करण्याची संधीच शोधत असता.
तुम्ही दुसऱ्या स्त्रीकडे पाहिलं, तर तुम्ही फ्लर्ट करता
दुसऱ्या पुरुषाने तिच्याकडे पाहिलं, तर तो तिच्या सौंदर्याचं कौतुक करत असतो.
तुम्ही बोलत असाल, तर तुम्ही ऐकावं असं तिला वाटतं
तुम्ही ऐकत असाल, तर तुम्ही बोलावं असं तिला वाटतं.
अशा या साध्या, तरीही समजून घ्यायला कठीण अशा मुली. यांना समजून घेणं कठीण असलं, तरी हव्याहव्याशा अशा याच मुली...

प्रेमात पडलेल्यांची लक्षणं…....


 प्रेमात पडलेल्यांची लक्षणं…....

बरेचदा असं होतं, की लोकं प्रेमात पडलेले असतात, पण त्यांचं त्यांनाच समजत नाही की आपण खरंच प्रेमात पडलोय म्हणुन. तर अशा लोकांसाठी त्यांना समजावं की आपण प्रेमात पडलो आहोत म्हणुन मुद्दाम हे पोस्ट टाकतोय. प्रेमात पडलेल्यांची लक्षणं. तुम्ही स्वतःला या मधली किती लक्षणं लागु होतात ते पहा, आणि या प्रेम रोगावर ’योग्य’ रिपिट ’योग्य’ ते उपचार करुन घ्या..


१) जिच्यावर प्रेम आहे तिच्या व्यतिरिक्त जगातिल प्रत्येकच मुलगी दिसायला ’तिच्यपेक्षा डावी’ दिसु लागते. मग यामधे ऐश्वर्या रायचा फोटो जरी समोर ठेवला, तर ऐश्वर्याचं पण नाक वाकडं दिसु लागतं..

२) प्रत्येकच वस्तु मधे तिचा चेहेरा दिसु लागतो. जिथे पहावं तिथे ती आहे असा भास होतो.

३) फोनची रिंग वाजली की तुम्ही फोन कडे धावता, तिचाच फोन आला असावा असं वाट्तं रहातं सारख.

४) एकदा तिच्याशी फोन वर बोलणं सुरु झालं की ते कधी संपुच नये असं वाटतं. फोन ठेवतांना तिने फोन बंद केल्याशिवाय तुम्ही हॅंग करित नाही.

५) तिच्या प्रत्येक ’मिसकॉल’ची आतुरतेने तुम्ही वाट पहात असता. आणि मिसकॉल मिस होण्यापुर्वीच कॉल बॅक करता. आपल्या प्रिपेड कार्डच्या बॅलन्स ची केअर न करता…

६) मित्रांशी तुम्ही खोटं बोलणं सुरु करता.

७) स्टॅग पार्टीला जाउन मित्रांबरोबर मस्ती करण्यापेक्षा तिच्या बरोबर पेटीकोट,भाजी, ओढणी सारख्या फालतु गोष्टी शॉपिंगला जाणं तुम्हाला जास्त महत्वाचं वाटू लागतं.

८) तिच्या बरोबर अगदी रडूबाई सिनेमा पण तुम्ही आवडिने पहाण्यास तयार असता. प्रसंगी न कळणाऱ्या भाषेतिल चित्रपट जसे शंकराभरणम वगैरे पण तुम्ही ’आवडीने’ पहाता .

९)जगातली सगळ्यात सुंदर मुलगी म्हणजे ’ती’च हे अगदी पक्कं बसतं मनामधे.. आणि ते मत म्हणजे काळ्या दगडावरची रेघ असते.

१०) आईने / वडिलांनी हाक मारली तरी पण ऐकु येत नाही

११) सिध्दीविनायकाच्या ट्रिप्स वाढल्या असतात.

१२) क्लास मधे शिकवत असतांना लेक्चरर पेक्षा तिच्या कडे जास्त लक्ष जातं.

१३) कोरा कागद, आणि पेन सापडला, की त्यावर आपोआप तिचंच नाव लिहिलं जातं

१४) दुकानात नविन पेन विकत घ्यायला गेलात, तरी पण लिहुन पहातांना स्वतःच्या नावा ऐवजी तिचंच नांव लिहुन पेन चेक करता.

१५)बॉस ला फोन करायला म्हणुन रिसिव्हर उचलता, आणि तिचा नंबर डायल करता.

१६)कुठेही वर्तुळाकार वस्तु दिसली की त्या मधे तिचाच चेहेरा दिसणं सुरु होतं.

१७)शिर्डीच्या साईबाबाचा दोरा हाताला बांधला असतो. प्रत्येक मंदिरासमोर येता जाता हात जोडुन उभे राहिल्याशिवाय बरं वाटत नाही.

१८)ऑफिसचा रस्ता तिच्या घरासमोरुन जातो. आता ऑफिस पश्चिमेला आणि तिचं घर पुर्वेला असलं तरीही..

१९)तिच्या भावाशी मैत्री करण्यासाठी तुम्ही काहिही करण्यास तयार असता.

२०) तिचे मित्र मैत्रीणी आपले पण मित्र व्हावेत म्हणुन तुम्ही पदरचे पैसे खर्च करायला पण तयार होता. केवळ तिचा सहवास लाभावा म्हणुन..

२१)तिला आवडतं म्हणुन तुम्ही अगदी चाटवाल्या भैय्याच्या गाडिवर -(ज्याला तुम्ही नेहेमी शिव्या घालता, घाणेरडा म्हणुन )तिच्या सोबत उभे राहुन चाट आवडिने खाता..

२२) तिचे वडिल दिसले की तुम्ही अगदी शालिनपणाचा मुखवटा पांघरुन ( कारण तुम्ही शालिन नाही हे मला माहिती आहे ) त्यांना गुड मॉर्निंग , गुड इव्हिनिंग, किंवा हॅव अ नाइस डे अंकल करता तेंव्हा.. नक्कीच!!

२३)तिच्या भावाला बुलेटवर बसुन येतांना तुम्हाला साक्षात यमराज रेड्यावर बसुन आल्याचा भास होतो.

२४)तुम्ही बुक एक्झीबिशन मधे मुद्दाम जाता आणि शेर ओ शायरी, किंवा गझल्स ची पुस्तकं विकत आणता.

२५) रॅप, किंवा डीस्को ऐवजी तुम्हाला गझल ऐकत रहाणं आवडतं . तलत मेहमुद एकदम फेवरेट सिंगर बनतो. या जगात फक्त तलत चा आवाज शाश्वत आहे बस्स.. बाकी सब कुछ झुट है! असं वाटु लागतं.

२६)तिला आवडतो ,म्हणुन तुम्ही गुलाबी किंवा पर्पल कलर चा शर्ट विकत घेता आणि आवडिने घालता..

२७)एकटे बसले असला की दिवा स्वप्न पहाणं सुरु करता.त्या स्वप्नात केवळ तुम्ही आणि ती.. बस इतर कोणिच नसतं. लोकांना ब्लॅक ऍंड व्हाईट स्वप्न पडतात, तर तुम्हाला कलर!!

२८)झोपेचं पार खोबरं होतं. रात्री तासन तास तुम्ही तळमळत काढता तिच्या आठवणीत..

२९)तुमचे ऑफिस जरी १० वाजता असले, तरी तिच्या वेळेवर म्हणजे सकाळी ८ वाजता तुम्ही घरुन निघता, आणि तिच्याच बसने प्रवास करता.

३०) सिनेमाची हिरोइन पण तिच्या सारखीच दिसायला लागते, आणि हिरो तुमच्या सारखा.

३१)तिच्या नावाच्या स्पेलिंगचं प्रत्येक अक्षर सेक्सी दिसु लागतं.

३२) तिच्या कडे पाहिलं की ताजमहाल पाहिल्याचं समाधान मिळतं.

३३)तिच्या नावातले, आणि तुमच्या नावातले कॉमन अक्षरं तुम्ही शोधुन त्यांची न्युमरॉलॉजी ने व्हॅल्यु काढता..

३४) तुम्ही मेसेंजर वर नेहेमी अदृष्य रहाता, ती आल्यावर इतर मित्रांनी त्रास देउ नये म्हणुन.. आणि तुम्हाला फक्त तिच्याशीच चॅट करायला आवडतं . चॅटींग कमित कमी दोन तास.. एका बैठकीत..

३५)मित्रांनी बोलावलं, तर टाळुन तिच्या घरासमोर जाउन टाइम पास करणं तुम्हाला जास्त आवडतं.

३६) तिच्या कॉलेज समोरचा कॅंटीनवाला तुम्हाला उधार द्यायला पण तयार होईल इतके वेळा तुम्ही तिथे जाउन बसता.

३७)कपड्यांच्या बाबतीत तुम्ही खुप सेंटीमेंटल होता. आणि नेहेमी अगदी अप टु डेट रहाता.. काय सांगावं ती कधी भेटेल ते??

३८)जगातली सगळ्यात सुंदर भाषा म्हणजे उर्दू ( जरी येत नसली तरीही) वाटू लागते. मराठी एकदम डाउन मार्केट.

३९)अरुण दाते एकदम फेवरेट सिंगर होतो. मग दिवस तुझे हे फुलायचे ऐकलं, की तिचा चेहेरा डोळ्यापुढे येतो.

४०) नॅटकिंग कोल चे लव्हसॉंग्ज पण खुप आवडायला लागतात..

४१)गुलाम अलीचा मधाळ आवाज हदयाला घरं पाडतो, आणि शक्य होईल तेंव्हा तुम्ही ऐकत असता ही गाणी. बरेचदा बडे गुलाम अली खां पण ऐकायचा प्रयत्न करता तुम्ही.

४२)भुक वगैरे काही लागत नाही, उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म या उक्ती प्रमाणे जे काही पानात पडेल ते तुम्ही न कुरकुरता खाता. अगदी शेपुची भाजी सुद्धा.आणि जर आईने आश्चर्याने पाहिलं तर शेपु कसा तब्येतिला चांगला, यावर पण बोलता..

४३) भांग व्यवस्थित मनासारखा जमल्याशिवाय आणि कपड्यांना कडक इस्त्री असल्याशिवाय घराबाहेर पाउल पडत नाही , ( काय सांगावं ती कधी भेटली तर कुठे??).

४४)ऑर्कुट स्क्रॅप या कम्युनिटीला जॉइन करुन रोज तिला नविन कुठला स्क्रॅप पाठवायचा याची काळजी करित बसता.

४५) तिच्या फ्रेंड लिस्ट मधे एखादा ’नको असलेला’ तर ऍड होत नाही, याची खात्री करुन घेण्यासाठी तिच्या फ्रेंड्स्च्या प्रोफाइलला रेग्युलरली मॉनिटर करता.

४६)लव्ह, प्रेम, प्यार शब्द असलेले एस एम एस शोधुन तिला पाठवता..

४७) तिला गुड मॉर्निंग म्हंटल्या शिवाय तुमचा दिवस सुरु होत नाही, आणि गुड नाईट म्हंटल्याशिवाय रात्र!!

४८)तिच्याशिवाय हे जीवन व्यर्थ आहे असे वाटु लागते.

४९)तिला पहायला कोणी आलं की तुमचा जीव कासाविस होतो, आणि तुमच्या मंदिराच्या फेऱ्या सुरु होतात.

५०)तुमचे संध्याकाळी पाच वाजता भेटायचे ठरले असतांना, तुम्ही मात्र चक्क एक तास भर आधी तिथे जाउन तिची वाट पहाता.. अजिबात कुरकुर न करता.वाट बघतांना एक एक सेकंद तुम्हाला एक एक युगा प्रमाणे वाटतो , आणि दर दोन मिनिटांनी तुम्ही घड्याळाकडे पहाता..
५१)समोर कागद – पेन असेल तर तुम्ही सौ. तिचं नाव+ तुमचं नाव+ तुमचं आडनाव लिहुन पहाता,आणि खुळ्यासारखे स्वतःशीच हसता.

५२. तिच्या वाढदिवसाला काय गिफ्ट द्यावं याचा विचार २ महिने आधीपासुनच करता.

५३. तिला “प्रपोज” कराण्यासाठी रोज उजळणी करता आणि कोणतं वाक्य बोलावं यावर रिसर्च सुरु होतो.

५४. तिच्यासमोर “मॆच्युअर” असल्याचा आव आणता, कितीही बावळट असलात तरीही.

५५. असा परफ्युम मारता जसं काही जगात पाण्याचा दुष्काळ पडला आहे.

५६. समजा ती हो म्हणालीच तर पुढची गणितं कशी जुळवायची आणि सगळ्यांना कसं पटवायचं याचे काल्पनिक प्रसंग मनाशी रचता.

५७. तिने सही केलेला कागद “लकी चार्म” म्हणुन पाकीटात ठेवता.

५८. तिला इन्कम टॆक्स आणि इंशुरन्स पॊलिसी किंवा डाळ तांदळाचे वाढील भाव वगैरे फालतु विषयांवर कधीतरी बोलता म्हणजे तुम्ही किती संसारिक आहात हे सिद्ध करता येतं.

५९. बसला ५ रुपये जिवावर आल्यासारखे देणारे तुम्ही बिनदिक्कतपणे रोज टॆक्सीला १०० रुपये खर्च करु लागता.

६०. तुम्हाला भीती वाटते की तुम्ही तिच्यासमोर “तुझा टकल्या बाप खडुस आहे” हे वाक्य चुकुन बोलुन जाल. हे हे हे.

६१) ती रोज नीट जेवते की नाही घरी असो किवा ऑफीस, मग रोज तिला विचारायाच काय जेवलीस, आणि जर तू नाही नीट नाही जेवलीस तर मी पण नाही जेवणार असा एमोशनल ब्लॅकमेल करण…

६२) तिला बर नसेल तर ती नीट औषध घेतेय ना याची काळजी करेल, भले स्वत: च्या तब्येतीचे तीन-तेरा वाजू देत..

६३) तिला काय खायला आवडत किवा काय आवडत नाही याची यादी तोंडपाठ एकदम…मग आपल्याला त्या पदार्थाची आवड असो नसो, हसत हसत ताव मारायचा तिच्या सोबत..

६४) तिच्याकडे फोन आहे का व असला तर नंबर काय असेल, याची माहिती काढण्यासाठी एखाद्या जेम्स बॉंडच्या पिच्चरमधील सीन प्रमाणे तुम्ही प्रयत्न चालू करता…

६५) जर ती पहिल्यांदाच फोनवर बोलली तर तीला पुढच्या फोनसाठी तयार करण्याकरता तुम्ही काहीही, जे बोलता येईल ते बोलता, जसे की पहिले तर नाव, कॉलेज, ब्रांच वगैरे वगैरे… तिने यांचे उत्तरे दिल्यावर साहजिकच तीच हे प्रश्न रीपीट करते… त्यांनतर रात्री एखादा गोड असा मॅसेज पाठवता…
६६) त्यानंतर दुसर्‍याच दिवसापासून जेवढे कॉल रेट कमी करणारे प्लॅन, मेसेज रेट कमी करणारे प्लॅन्स असतील, ते मिळेल तेवढ्या किमतींत ऍक्टिवेट करवून घेता. एखाद्यावेळी सिम-कार्डही चेन्ज करता…

६७) दुसरी कोणी जवळ आली तर तीला टाळण्याचा प्रयत्न करता..(कोण जाणे, तीने हीच्यासोबत मला पाहू नये या विचाराने… )

६८) अभ्यासात जरा जास्तच लक्ष लागलंय असं घरच्यांना वाटण्यासाठी पुस्तकं हातात घेता, पण मुळात मात्र एक ओळही वाचत नाही, तिचेच विचार चालू असतात…

६९) कोणतीही दुसरी पाहिली की त्या दुसरीच्या ड्रेसमध्ये तीला फिट करून पाहता, जर छान दिसली तर तिच्या बाजूला आपणही आहोत असा भास करवून घेता…

७०.तिच्याशी जवळीक वाढवणारे मास्टर प्लेन करण्यात बराच मेंदु खर्ची घालणे

७१.बरयाच गोष्टी विसरायला लागता…

७२.घरचे एखादे काम सांगीतल्यावर नाक मुरडणारे तुम्ही तिच्या छोट्याश्या(फ़ालतु) कामासाठी जंग जंग पछाड्णे.

७३.तिला आवडणार प्रत्येक गाण/पुस्तक/सिनेमा आपोआप तुम्हालाही आवडु लागणे.

७४.आयुष्याबाबत उगाचच जास्त सिरियस होता..

७५.कधी कधी काही न बोलता तांसतास फ़क्त तिच्या चेहरयाकडे पाहत राहावस वाटणे.

७६.तिच्या मेलची/किंवा ती ओ.ऐल. आली आहे का हे पाहाण्यासाठी परत परत लोगिन किन्व पेज रिफ़्रेश करणे.

७७.सभोवताली बरेच लोक असुन सुदधा खुप ऐकट वाटणे.

७८.आरश्यासमोर उभ राहाण्याचा वेळ वाढणे.

७९.मन,ह्रुदय,वारा,पाउस,चन्द्र या शब्दांचे नवे नवे अर्थ उलगडु लागणे.

८०.काहीही करतांना ’हे तिला आवडेल का’ हा विचार मनात येणे.

एक अति श्रीमंत पिता आणि मुलगा

एक अति श्रीमंत पिता आणि मुलगा
एक अति श्रीमंत पिता आपल्या मुलाला एका खेड्यात घेऊन गेला।लोक किती गरिबीत जीवन जगतात हे मुलाला दाखवण्याचा त्याचा उद्देश होता.
एका गरीब कुटुंबात शेतातील घरात दोन दिवस ते राहिले.
आपल्या घरी परततांना त्यने मुलाला विचारले ,
' कशी झाली ट्रिप ? '
' फारच छान डॅड '
' गरीब लोक कसं जीवन जगतात बघितलंस ना? '
' हो ' मुलगा म्हणाला.

' हं आता मला सांग हे बघितल्यानंतर तू काय शिकलास ?' वडीलांनी विचारलं
मुलगा म्हणाला '' मी बघितलं आपल्याजवळ एक कुत्रा आहे तर त्यांच्याजवळ चार .''
आपल्या बागेच्या मध्यभागी एक तळं आहे तर त्यांच्याजवळ खाडी आहे की जिला अंत नाही.

आपल्या बागेत इंपोर्टेड दिवे आहेत तर त्यांच्याजवळ रात्रभर लुकलुकणारे तारे आहेत.

आपल्या बागेची सीमा कुंपणापर्यंत संपते त्यांच्यासाठी तर अवघं आकाश खुलं आहे.

राहण्यासाठी आपल्याकडे जमिनीचा लहानसा तुकडा आहे. तर नजर पोहोचणार नाही तिथपर्यंत त्यांची शेतं आहेत.

आपल्याकडे नोकर आहेत आपली सेवा करण्यासाठी आणि ते दुसर्‍यांची सेवा करतात.

आपले अन्न आपण विकत घेतो आणि ते स्वत: चं अन्न स्वत: पिकवतात.

संपत्तीचं रक्षण करण्यासाठी त्याभोवती आपण कुंपण बांधले आहे. रक्षणासाठी त्यांचे मित्र धावून येतात.

वडील स्तब्ध झाले.
मुलगा पुढे म्हणाला , '' आपण किती गरिब आहोत ते मला दाखवल्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे.

पाहण्याचा दृष्टीकोन ही अजब गोष्ट आहे की नाही ?
आपल्याजवळ जे नाही त्याचे दु:ख करण्यापेक्षा जे आहे त्याबद्दल परमेश्वराचे आभार माना

उखाणे

उखाणे


*मंगळसुत्राचे २ डोरले, एक सासर अन दुसरे माहेर,
---रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर


भाग्याचे कुन्कु प्रेमाचा आहेर
.........रावांच्या मिठित विसरते मी माहेर


*चान्दिच्या ताटात गाजराचा हलवा ,----- नाव घेते सोडा माझी वाट


*नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद
.........तर आहेत माझ्या डाव्या खिशात

*रिमझिम जलधारा बरसतात धरतीच्या कलशात,
..... चे नाव घेते असु द्या लक्षात.

*निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट
....रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास
*  आकाशात उडतोय पक्शान्चा थवा
.........चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा

*चान्दिच्या ताटात फणसाचे गरे...........राव दिसतात बरे पण वाकतिल तेव्हा खरे

*पाव शेर रवा पाव शेर खवा
.......... चे नाव घेते हजार रुपये थेवा.

*भातुकलीचा खेल मांडला चुल आणि बोळक्यात
..........च नाव घेतो मुर्खांच्या किंवा मित्रांच्या घोळक्यात


* पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय ' मोरुची मावशी ' ,
........ चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.

* श्रीरामाने भोगिला चौदा वर्षाचा वनवास,
....चे नाव घेते सखींनो आता करू नका सासुरवास

* एक होती चिऊ एक होती काऊ…...
......रावांच नाव घेते , डोक नका खाऊ…

* आजकाल च्या लग्न ठरलेल्या मुलीसाठी..
मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन ……
मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन ……
आणि ……. रावना मिस कॉल देते एक रूपया बैलेंस राखून..

* इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर .................च नाव घेते ............... ची लव्हर

*द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
...चे नाव घेते राखते तुमचा मान





*आकाशाच्या प्रागंणात ब्रन्हाविश्नु आणि महेश ,
......च नाव घेवुन करते मि ग्रुह प्रवेश




*नेत्ररुपी निरंजनात प्रेमरुपी फुलवात
----- चे नाव घेण्यास आजच केली सुरवात




*आकाशात उडतोय पक्शान्चा थवा
--चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा




*लग्नात्त लागतात हार आणी तुरे
.... च्या नाव घेण्याचा आगृह् आता पुरे




*वन, टु, थ्री
.... चं नाव घेते मला करा फ़्री




*घरापुढे अंगण,
अंगणापुढे ओसरी,
ओसरीपुढे माजघर,
माजघरात फ़डताळ
फ़डताळात चांदीचा भगुला
भगुल्यात ठेवला खवा
.....राव आले घरला आता तुम्ही जावा.




*सायंकाळी तुळशीपाशी, मंद ज्योत तेवते
बारशाचा दिवस म्हणून ...चे नाव घेते


*कोकिळेच्या कुजनात वसंत ऋतू गेला झटकन
...चे नाव पाहा घेतले, की नाही पटकन


*आशीवार्दाची फुले वेचते वाकून
...चे नाव घेते तुमचा मान राखून


*साधी राहणी, उच्च विचारसरणी
याच तत्त्वाने वागेल ...ची गृहिणी


*भरल्या पंगतीत रांगोळी काढली चित्रांची
पंगत बसली ...रावांच्या मित्रांची


*शुभ काळी शुभ वेळी आली आमची वरात
...रावांचे नाव घेते सासरच्या घरात



*नमस्कार फुकाचा, आशीर्वाद लाखाचा
...रावांसह संसार करेन तुमच्या आशीर्वादाने सुखाचा


*चंद्राचं प्रतिबिंब, पडलं तळ्यात
...रावांचं नाव घेते मैत्रिणींच्या मेळ्यात


*नमस्कार करता येतो मला, छान वाकून
...चं नाव घेते तुमचा मान राखून


*शंकराला वाहिलं बेलाचं पान
...चं नाव घेते हं, ऐका देऊन कान


*गोकुळातील मेळाव्यात श्रीकृष्ण वाजवतो पावा
...सारखा जोडीदार मला जन्मोजन्मी हवा



*कलीयुगात घडलाय यांच्या रुपाने चमत्कार...
आमुकरावांचे नाव घेऊन सर्वांना करते नमस्कार!!!




*आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास
-- ला भरविते जिलेबिचा घास


*आकाशात उडतोय पक्शान्चा थवा
--चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा
  
*निळे पाणी, निळे डोगर, हिरवे हिरवे रान,
.... चे नाव घेउन राखतो सर्वांचा मान


*सुखद वाटते हिवाऴ्यातले ऊन,
...रावाचे नाव घेते ...ची सुन

*हंसराज पंक्षी दिसतात हौशी,
---रावाचे नव घेते सत्यनारायनाच्या दिवशी


*निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट
....रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास



*शिवाजी राजांनी किल्ला जिंकला शक्ति पेक्षा युक्ति ने,
.......रावांच नाव घेते प्रेमा पेक्षा भक्ति ने


*केलेीच पान चुरुचुरु फाटत ...
....रावाच नाव घेताना कस कस वाटत


*नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा
...रावाच नाव मी घेईल तुमचा काय फायदा


* एवढा मोठा वाडा , वाडया समोर विहिर , विहिरीत होता कोनडा , कोनाडयात होती कोरी पाटी , पाटीत काळी माती , मातीत पेरले गहु , गव्हाला टाकलं पाणी , म्हणुन फुटले कोंब , कोंब दिसतात हिरवे पण काढायला कशी जाऊ , माझ लग्नच अजुन झालं नाही तर नाव कुणाच घेऊ .


*नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा
.....च नाव आहे लाख रुपये तोळा


*चिवड्यात घालतात खोब्ररयाचे काप
--- रावां समवेत ओलांडते माप


*बंगलौर.म्हैसूर,उटी म्हणशील तिथे जाऊ.
घास घालतो .........बोट नको चाउस


*कामाची सुरवात होते श्रीगणेशापासुंन
........नाव घेयला सुरवात केली आजपासून


*सूपभर सुपारी निवडू कशी,
गळ्यात माळ वाकु कशी,
पायात पैंजण चालू कशी,
........ बसले मित्रपाशी,
कपाटाची चावी मागू कशी..?


*काही शब्द येतात ओठातून
काही येतात गळ्यातून
राणी चं नाव येतं मात्र थेट हृदयातून


*हिरव्या शालुला जरिचे काठ
चे नाव घेते, सोडा माझी वाट


*लग्नात्त लागतात हार आणी तुरे
.... च्या नाव घेण्याचा आगृह् आता पुरे



*सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न,
....च्या सोबत झाले आताच माझे लग्न

बायकांचं जग

बायकांचं जग

कोण म्हणतो जग पुरुषांचं आहे. अहो, नीट पाहा . जग बायकांचं आहे. स्त्रीप्रधानच संस्कृती आहे आपली...

त्याला वर्गात पोहोचायला उशीर झाला, तर शिव्या पडतात...

तिला उशीर झाला, तर ' हल्ली बसेस लेटच येतायत' म्हणून सरच तिचं स्वागत करतात...

त्यानं तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तर म्हणतात, '' साला लाइन मारतोय बघ!''

ती त्याच्याशी बोलली, तर फक्त विशुद्ध मैत्री...

ती रडली, तर ती म्हणेल ते खरे...

तो रडला तर म्हणतात, पोरींसारखे रडणे शोभत नाही बरे...

मुलीला अपघात झाला, तर ती इतरांची चूक...

मुलाला अपघात झाला, तर ती फक्त त्याचीच चूक...

मुलगा स्त्रियांसाठी राखीव जागेवर बसला, तर तो मॅनरलेस, असंस्कृत...

मुलगी इतर सीट्सवर बसली, तर तिचा तो हक्कच...

तिनं मुलासारखा पोशाख केला, तर तिला आधुनिक म्हणतात...

त्यानं मुलीचा पोशाख केला, तर त्याला... तुम्हाला माहितीये काय म्हणतात...!!

Thursday, November 18, 2010

खरं प्रेम म्हणजे.....

खरं प्रेम म्हणजे .......
खरं प्रेम म्हणजे दोघांनी प्रत्येक परिस्थितीला धैर्याने तोंड देणे.
खरं प्रेम म्हणजे दोघांचा एकमेकांवर विश्वास असणे.
खरं प्रेम म्हणजे दोघांची एकमेकांवर निष्ठा असणे.
खरं प्रेम म्हणजे दु:खात एकमेकांच्या सोबत असणे.
खरं प्रेम म्हणजे सुखात एकमेकांना आनंद देणे.
खरं प्रेम म्हणजे तडजोड करण्याची तयारी असणं.
खरं प्रेम म्हणजे एकमेकांच्या गुणांना जपणे.
खरं प्रेम म्हणजे दुखावलेली मने परत जोडणे.
खरं प्रेम म्हणजे भांडण करुन परत जवळ येणे.
खरं प्रेम म्हणजे एकही शब्द न उच्चारता भावना पोहोचणं.
खरं प्रेम म्हणजे डोळ्यात फक्त आनंदाश्रु असणं.
खरं प्रेम म्हणजे एकमेकानां सांभाळणे.
खरं प्रेम म्हणजे चुकत चुकत शहाणे होणे.
खरं प्रेम म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असणे.
खरं प्रेम म्हणजे प्रेमबरोबर प्रमाणिक असणे.
खरं प्रेम म्हणजे … तू अणि मी, कायम जवळ असणे..!!

असंही प्रेम असतं!!

असंही प्रेम असतं!!

अशाच एका संध्याकाळी,मन खुप जास्तच उदास झालं होतं....

काय करु? काहीच सुचतं नव्हतं....

उगाच मनात विचार आला, चल स्मशानात जाऊयात....

गेलो मग स्मशानात एकटाच!बसलो एका थडग्याजवळ जाऊन....

थडगे ताजे वाटत होते....मनात कुतूहल जागले....

थडग्यावरचे नाव वाचले...' महनाज़ खान ' '१९८६-२००७'...

म्हणजे माझ्याच वयाची असेल!

कसं ग्रासलं असेल मृत्युने तिला?काय कारण असेल?

आजार? खून? का... का बाळंतपणात दगावली असेल ती?

मनात उगाच प्रश्नांचे काहूर उठले...

तेव्हढ्यात एक मुलगा त्या थडग्यावर फुले ठेवण्यासाठी आला....

मी त्याला विचारले ' तू भाऊ का तिचा?'

तो म्हणाला 'नाही, मी तो, ज्याच्यासाठी तिने आत्महत्या केली!'

मी विचारले ' आत्महत्येचं कारण?'

तो म्हणाला ' मला ब्लड कॅन्सर झालाय! २ आठवडे उरले आहेत फक्त!'

मी चकीत झालो!

विचारले ' मग तिने आत्महत्या का केली? तू जिवंत असतानाही?'

तो म्हणाला ' ती माझ्या स्वागताच्या तयारीसाठी पुढे गेली आहे!'

.......मी निशब्द....

असंही प्रेम असतं!!