Friday, October 29, 2010

सुविचार.................

- पैशाचे नाव अर्थ पण तो करतो मोठा अनर्थ (गोंदवलेकर महाराज)
- दुर्जनाला वेदांतात बुडवले तरी त्याला सुजनत्व येत नाही.
- त्याग हा सर्व प्रकारच्या कलेचा बिंदूच आहे. (महात्मा गांधी)
- युध्दाची खरी भयानकता त्यात माणसे मरतात ही नसून माणूस माणसाला मारायला तयार होतो ही आहे.
- जगात काही अजरामर नाही- तुमच्या चिंतासुध्दा!
- जेष्ठत्व केवळ वयामुळे नाही तर गुणांमुळे येते.
- लहान मुलांमध्ये आढळणारी चौकसवृत्ती म्हणजे ज्ञानाची भूक होय.
- आपले विचार वाळूत लिहा, क्षमेचे वारे त्यांना उडवून लावेल. आपले सुख दगडात कोरा, ते कोणीही खोडू शकणार नाही.
- सत्तेपेक्षा सामर्थ्य महत्त्वाचे असते.
- माणसाने आपल्या भरवंशावर जगावे.
- दीपज्योतीमध्ये असे सामर्थ्य आहे की स्वत: प्रज्वलीत होऊन दुस-याला प्रजलीत करते.
- आयुष्यात निश्चित काही मिळवावयाचे असल्यास साहस असावयास पाहिजे.
- सानेगुरूजीचे वाड्मय म्हणजे संस्काराचा झरा !
- उगीच जिथे रूजत नाही तेथे बी पेरू नये.
- जिथे मोल जाणत नाही तिथे शब्द टाकू नये.
- संस्कारामुळे माणसाला खरे माणूसपण येते.
- ग्रंथहीन घर म्हणजे देहहीन शरीर.
- शब्द जपून वापरावेत, शब्दांची धार तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे.
- कलीयुग कलीयुग म्हणू नका कलीयुगाला कलायुग बनवा!
- मृत्यु नेहमी समीप आहे धरून चालावे त्यामुळे मन वैराग्याकडे वळते.
- अंहकार आणि लोभ हे माणसांच्या जीवनातील सर्वात मोठे दु:ख आहे.
- चंद्र आणि चंदनापेक्षा सज्जनांचा सहवास शीतल असतो.
- काजव्याला वाटते जग आपल्याच लुकलुकण्यामुळे उजळले आहे.
- कर्तव्यदक्ष असावे पण कर्मठ नसावे.
- उत्साही असावे पण उतावीळ होऊ नये.
- कृतज्ञ असावे पण कृतघ्न नसावे.
- पवित्र असावे पण पतित होऊ नये.
- त्याग करावा पण ताठा नसावा.
- स्वाभिमान असावा पण गर्व नसावा.
- आत्मविश्वास असावा पण अंहकार नसावा.
- स्वतंत्र असावे पण स्वै नसावे.
- घाम गाळल्याशिवाय दामाची खरी किंमत कळत नाही.
- माणसाचे प्रेम हे धरती सारखे असते अगोदर एक दाणा पेरावा लागतो.
- सुखी होण्यासाठी सुखी होण्याचा मार्ग म्हणजे निसर्गावर, नियतीवर…परमेश्वरावर कोणावर तरी विश्वास ठेवा!
- मानवी संबंध धावणा-या आगगाडीच्या वेळापत्रकाप्रमाणे नसतात…ते असतात आडव्याऔदुबंराच्या तिडव्या पाय वाटासारखे.
- श्रध्दा ही सामर्थ्यवान असते. कशावर तरी श्रध्दा ठेवल्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही.
- ज्याच्या जीवनामध्ये निश्चित ध्येय नसते त्यालाच वेळ घालविण्यासाठी साधन शोधण्याची गरज भासते.

No comments: